आर्थिक नियोजन म्हणजे काय? तर मिळकत, खर्च आणि गुंतवणुकीचा ताळमेळ होय. पैसे हातात आले की, त्यातून खर्च करायचा, ठरावीक रक्कम गुंतवायची आणि भविष्याची तरतूद करायची असे सरळ समीकरण आहे हे. हो ना? त्याच्यासाठी खूप डोकेफोड करायला हवी असं वाटत नाही. बरोबर ना? सहा आकडी मासिक मिळकत असणाऱ्यांना तर यात काहीच कठीण वाटत नाही. कारण आजच्या घडीला त्यांच्या हातात कदाचित त्यांच्या गरजेपेक्षा खूप जास्त रक्कम शिल्लक राहत असेल. नोकरीमध्ये खूप यश मिळालं असेल किंवा इतर कोणाची जबाबदारी नसेल. तेव्हा मौजमजा करायला काहीच हरकत नाही. हेच जेव्हा आपण कमी मिळकत असणाऱ्या कुटुंबाकडे बघतो, तर तिथे आयुष्यभर कदाचित काटकसर करून आला दिवस पुढे ढकलावा लागतो. तसं पाहायला गेलं तर इथे पैसे पुरत नाही तर उरणार कसे? मात्र सहा आकडी पगार असणारे पैसे गुंतवू शकले असते. मात्र त्यांना दूरदृष्टी आणि परिस्थितीची संपूर्ण जाणीव नसल्याने वेळेवर आणि मुळात हवी तेवढी गुंतवणूक न झाल्याने पुढील काळामध्ये निवृत्ती निधी कमी पडू शकतो. ही जाणीव आपल्यातील बऱ्याच जणांना होतंच नाही. इथवर आलो तर मग इथून पुढेही निभावेल असा भाबडा विश्वास कदाचित यांना वाटत असावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा