डॉ. आशीष थत्ते

‘रामस्वामी कंडस्वामी षण्मुखम् चेट्टी’ या नावाचा उल्लेख जर कुठे ऐकला असेल तर नक्की सांगा. अर्थातच स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणजे सर षण्मुखम् चेट्टी. ब्रिटिश साम्राज्याने त्यांना ‘सर’ हा दर्जा दिला होता. २६ नोव्हेंबर १९४७ रोजी भारताचा पहिला अर्थसंकल्प चेट्टी यांनी सादर केला गेला. त्यांची अर्थमंत्री पदापर्यंतची कहाणी रंजक आहे. कारण ते कधीही काँग्रेसमध्ये नव्हते, पण तरीही भारताचे पहिले अर्थमंत्री होते. महात्मा गांधींच्या आग्रहामुळे जे लोक तत्कालीन काँग्रेसमध्ये नव्हते ते या पहिल्या मंत्रिमंडळात सामील होते त्यापैकी एक चेट्टी होते. तत्कालीन पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना मंत्रिमंडळात सामील करून घ्यायला फारसे उत्सुक नव्हते. मात्र तरीही गांधीजींच्या आग्रहाखातर त्यांना अर्थमंत्री बनवावे लागले.

Decision from Wipro on Thursday on reward shares
बक्षीस समभागावर विप्रोकडून गुरुवारी निर्णय
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
‘गतिशक्ती’ परिवर्तनशील उपक्रम; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, पायाभूत सुविधांमध्ये क्रांतीचा उद्देश
fortified rice central government
फोर्टिफाइड तांदूळ म्हणजे काय? २०२८ पर्यंत हे तांदूळ मोफत वाटप करण्याचा निर्णय सरकारने का घेतला?
rupay card launch in maldives
भारताच्या ‘RuPay’ कार्डची सेवा आता मालदीवमध्येही; इतर कोणकोणत्या देशांत चालतं रुपे कार्ड? त्याचा फायदा काय?
no india pakistan bilateral talks during sco meet says s Jaishankar
पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय चर्चा नाही : जयशंकर
Piyush Goyal
Piyush Goyal : ‘…म्हणून मला माझ्याच घरात पाच वर्ष प्रवेश करता आला नव्हता’, मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितला घर विकत घेतानाचा अनुभव
Nitish Kumar government
बिहारमध्ये ११४ वर्षांनंतर भूमी सर्वेक्षण; नितीश कुमार सरकारच्या निर्णयावर विरोधकांची टीका कशासाठी?

गिरणी मालकांना करचोरीच्या प्रकरणाअंतर्गत तपास होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर केल्यामुळे त्यांनी आपल्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला. काही ओळखीच्या लोकांची नावे त्यांनी या तपासातून वगळली असे लक्षात आल्यावर पंडितजींनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. म्हणजे कदाचित स्वतंत्र भारताचे पहिले राजीनामा देणारे मंत्री म्हणूनसुद्धा त्यांची ओळख असावी. त्यांचे योगदान फक्त एवढेच नसून त्यांनी ब्रिटिश सरकारसाठी खूप काम केले आणि तामिळ भाषेसाठी त्यांचे योगदान अमूल्य होते. बऱ्याच तामिळ भाषेसाठीच्या संघटनांची स्थापना आणि काही संघटनांचे अध्यक्षपददेखील त्यांनी भूषवले. अन्ना मलाई या प्रसिद्ध विद्यापीठाचे त्यांनी कुलगुरू म्हणून काम बघितले. ५ मे १९५३ रोजी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

विश्लेषण: देशाच्या जमापुंजीचे गणित ठरवणारा अर्थसंकल्प कसा तयार होतो? कशी असते ही प्रक्रिया?

चेट्टी यांनी सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पात १७१ कोटी रुपयांचे उत्पन्न आणि १९७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला होता. म्हणजे वित्तीय तूट सुमारे २६ कोटी रुपयांची होती. मागील अर्थसंकल्पातील वित्तीय तूट सुमारे ९.९० लाख कोटी रुपयांची होती. यावरून तुम्हाला त्यावेळेच्या आणि सध्याच्या अर्थव्यवस्थेची व्याप्ती लक्षात येईल. ही तूट नंतर कमी होऊन सुमारे ६ कोटी रुपयांवर आली होती. खर्चांमध्ये काही विद्यापीठांना अनुदाने दिली होती, तर सुमारे १० कोटी रुपये विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी राखून ठेवले होते. पहिला अर्थसंकल्प हा अंतरिम होता. कारण तो नोव्हेंबर १९४७ मध्ये सादर केला होता आणि तो ३१ मार्च १९४८ पर्यंतच्या अंदाजाचा होता. दुसरा अर्थसंकल्पदेखील सर चेट्टी यांनीच सादर केला आणि तो पूर्ण अर्थसंकल्प होता.

twitter – @AshishThatte

email – ashishpthatte@gmail.com