एक काळ असा होता की, ज्यांच्याकडे नियमितपणे उत्पन्न येत होते त्यांच्यासाठी पैसे कुठे गुंतवायचे? याचे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके मार्ग उपलब्ध होते. गावात-शहरात घराजवळ असली तर बँक, नाहीतर पोस्ट ऑफिसच होते. त्यातल्या त्यात ज्यांचा संबंध येत असे त्यांच्यासाठी शेअरमध्ये वगैरे गुंतवणूक करणे हा पर्याय होता. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया अर्थात ‘यूटीआय’ सुरू झाल्यावर सर्वसामान्य माणसाला शेअर बाजारात अप्रत्यक्ष प्रवेश मिळायला सुरुवात झाली तरी त्याचा प्रवाह शहरांपुरताच मर्यादित होता. हे चित्र नव्वदीनंतर बदलायला सुरुवात झाली. ज्यावेळी भांडवली बाजार हळूहळू नियंत्रण मुक्ततेच्या दिशेने जात होते, म्हणजेच बाजारामध्ये धोरणात्मक सुधारणा होत होत्या. याचा पहिला परिणाम दिसला तो परदेशी गुंतवणूकदारांना भारतामध्ये गुंतवणुकीचे मुक्तद्वार मिळाले आणि भारतीय बाजारामध्ये खासगी म्युच्युअल फंड कंपन्यांचा प्रवेश झाला. या घटनेला आज तीस वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आता भारतीय गुंतवणूकदारांना परदेशी बाजारपेठेतील गुंतवणूक खुणावू लागली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा