इतिहासातल्या पुतण्याला ‘काका मला वाचवा’ टाहो फोडावा लागला होता. राजकारणातले काका-पुतणे नात्यांचे रंगही वेगळेच. तर उद्योग- व्यवसायातील केशुब महिंद्र आणि आनंद महिंद्र हे काका-पुतण्याचे वेगळेच नाते आपल्यापुढे आहे. केशुब महिंद्र यांना मुलगा नसल्याने त्यांनी सुरू केलेला उद्योगसमूह सांभाळण्याची जबाबदारी आनंद महिंद्र यांच्याकडे आली. ती त्यांनी यशस्वीपणे सांभाळलीच, शिवाय वडील हरीश महिंद्र यांनी सुरू केलेले व्यवसायसुद्धा चांगल्याप्रकारे वाढवले. त्यांची कामगिरी बाजार मूल्यांकनाच्या भाषेत जर मोजायची तर, महिंद्र ॲण्ड महिंद्र या कंपनीचे बाजार मूल्यांकन ३ लाख कोटी रुपये झाले आहे. येथे केवळ फक्त एकाच कंपनीच्या बाजार मूल्यांकनाला विचार घेतले आहे. कारण २७ डिसेंबर २००५ या दिवशी महिंद्र ॲण्ड महिंद्रचे बाजार मूल्यांकन ७,०६८ कोटी रुपये होते. त्यामुळे गेल्या २० वर्षात बाजार मूल्यांकन ४० पट वाढलेले आहे. भारतातली सर्वात मोठी खासगी क्षेत्रातली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज या कंपनीचे बाजार मूल्यांकन २० वर्षात २० पट वाढले आहे. त्या तुलनेत आनंद महिंद्र यांची कामगिरी निश्चितच उल्लेखनीय आहे. या कामगिरीचे महत्त्व एवढ्यासाठी विचारात घ्यायचे की, ४ सप्टेंबर १९९१ ला ते महिंद्रचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर झाले, २००१ ला व्हाइस चेअरमन, ऑगस्ट २०१२ ला चेअरमन आणि २०१६ पासून एक्झिक्युटिव्ह चेअरमन असा त्यांचा प्रगतीचा आलेख आहे. लंडनच्या ‘इकॉनॉमिस्ट’ या मासिकाने भारतीय भांडवल बाजाराचा चेहरा असा समर्पक उल्लेख आनंद महिंद्र यांचा म्हणूनच केला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा