उदारीकरणानंतर भारतात उदयास आलेल्या कोणत्या क्षेत्राने भारतीय अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला? याचे उत्तर अत्यंत सोपे आहे ते म्हणजे ‘माहिती तंत्रज्ञान उद्योग’. नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनी अर्थात नॅसकॉमच्या अहवालानुसार भारतीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांचा व्यवसाय आर्थिक वर्ष २०२२ अखेरीस २२७ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. त्यामध्ये वार्षिक १५ टक्के दराने वाढ होत असून या वर्षभरात तो २५० अब्ज डॉलरवर पोहोचणार आहे. भारतातील आयटी उद्योगाने नव्वदच्या दशकात आपले पाय रोवायला सुरुवात केली. अमेरिकेत माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा विस्फोट होत असताना कंपन्यांनी आपली कामे करण्यासाठी प्रोग्रामिंग करणारे तरुण मिळवायला सुरुवात केली. संपूर्णपणे खासगी क्षेत्राने विकसित केलेला भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योग पहिला उद्योग ठरला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएस, विप्रो, पटणी कॉम्प्युटर्स, इन्फोसिस या चार कंपन्या पहिल्या फळीतील उद्योगाच्या भरभराटीच्या लाभार्थी ठरल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा