करोना महासाथीमुळे अनेकांची न भरून काढता येणारी हानी झाली. मात्र या संकटाने लोकांचे कान टोचून त्यांना आरोग्यविमा का असायला हवा याचं महत्त्व पटवून दिलं. अर्थात या आधी आपल्याकडे आरोग्यविमा नव्हता असं नाही. परंतु आपल्यातील अनेक जण अपुऱ्या विमा योजना घेऊन निर्धास्त होते आणि अनेकांच्या योजनांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे वजाबाकी असल्याने पुरेसा क्लेम मिळाला नव्हता. त्यानंतरच्या काळात तर जवळपास सर्वच विमा कंपन्यांनी विम्याचे हप्ते (प्रीमियम) वाढवले. आज साधारण सर्व नोकरदार वर्गाकडे त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आरोग्यविमा असतो. काही ठिकाणी फक्त नवरा, बायको आणि मुलांनाच पॉलिसीमध्ये घेण्यात येतं, तर काही ठिकाणी आई, वडील, सासू आणि सासरे हेसुद्धा ग्राह्य धरले जातात. परंतु एवढं पुरेसं आहे का? आपल्याला नक्की किती रकमेचा आरोग्यविमा हवा याचा काही ठोकताळा करता येतो का? आजच्या लेखातून या प्रश्नाचं उत्तर शोधून आपण त्यानुसार आर्थिक नियोजन कसं करावं हे जाणून घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा