RBI Loan Rule: आजकाल बरेच लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात. गृह कर्ज, कार कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज, असे कर्जाचे अनेक प्रकार आहेत. जर तुम्ही देखील बँकेकडून कर्ज घेतले असेल तर तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) नियम माहीत असले पाहिजेत. हे RBI नियम तुम्हाला डिफॉल्टपासून वाचवतील आणि EMI कमी करण्यात मदत करतील.

हेही वाचाः ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताच्या वाटचालीत जैव अर्थव्यवस्थेसह नॅनो सायन्सचे लक्षणीय योगदान- केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

Ajna card stealing gang , mobile tower, Vasai,
वसई : मोबाईल टॉवरमधील आझना कार्ड चोरणारी टोळी गजाआड, परदेशातून गुन्ह्यासाठी व्हायचा वापर
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
survey of the cluster scheme was halted due to public outrage
नागरिकांच्या रोषामुळे क्लस्टर योजनेचे सर्व्हेक्षण थांबवले
kalyani strategic systems collaborates with us defence companies
कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सचा अमेरिकी संरक्षण कंपन्यांशी करार; अत्याधुनिक तोफा मंच बनविण्यासाठी भागीदारीचे पाऊल
9 out of 10 people make losses in F&Os according to a report by capital markets regulator SEBI
‘एफ अँड ओ’मध्ये १० पैकी ९ जण तोट्यात; भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड
cyber crimes on name of increasing subscriber likes and followers on social media
सोशल मीडिया युजर्ससाठी महत्त्वाची बातमी… लाईक्स, फालोअर्स आणि सबस्क्राईबर…
amazon employee cut off
‘सायलेंट सॅकिंग’ म्हणजे काय? ॲमेझॉन आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यासाठी याचा वापर का करत आहे?
cybercriminals india post fraud marathi news
विश्लेषण: सायबर गुन्हेगारांकडून ‘पोस्टल स्कॅम’चा वापर… काय आहे हा कुरिअर फसवणुकीचा नवा प्रकार?

नियम काय आहेत?

‘क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड’ (CIBIL) लोकांच्या कर्ज किंवा क्रेडिट कार्ड खर्च करण्याच्या सवयींवर लक्ष ठेवून असते. एका रिपोर्टनुसार, लोकांमध्ये असुरक्षित कर्ज (क्रेडिट कार्डमधून खर्च) घेण्याची सवय वाढत आहे. कोविडपूर्व काळापासून वैयक्तिक कर्जातही वाढ झाली आहे. उदाहरणार्थ, तुम्ही १० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे, परंतु तुम्ही काही कारणास्तव ते परत करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्जाची पुनर्रचना करू शकता. यासह तुम्हाला नंतर ५ लाख रुपये द्यावे लागतील आणि उर्वरित ५ लाख रुपये दीर्घ कालावधीसाठी हळूहळू भरता येतील. यामुळे तुमच्यावरील EMI चा दबावही कमी होईल.

हेही वाचाः BSE नंतर आता NSE चे बाजारमूल्य ४ ट्रिलियन डॉलर पार, बाजारातील वाढ कायम

नेमका फायदा जाणून घ्या

लोकांसाठी कर्जाची पुनर्रचना करणे हा एक चांगला पर्याय आहे, कारण ते त्यांच्याकडून कर्ज परतफेडीचा टॅग काढून टाकण्यास मदत करते. जेव्हा एखादी व्यक्ती कर्ज थकबाकीदार बनते, तेव्हा त्याचा क्रेडिट इतिहास खराब होतो. यामुळे CIBIL स्कोअरही घसरू शकतो, ज्यामुळे भविष्यात कर्ज घेण्याचे मार्ग बंद होऊ शकतो. कर्ज देण्यापूर्वी कोणतीही बँक तुमचा CIBIL स्कोर एकदा तपासते. तो त्याच्या मानकांनुसार असेल तरच कर्ज मंजूर करतो. अन्यथा कर्जाची रक्कम नाकारली जाते.