टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या भारतातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने आपले भविष्यकालीन इरादे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आहेत हे स्पष्ट केले आहे. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस’चे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या कंपनीच्या शेअर होल्डर्सना लिहिलेल्या पत्रात याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून जागतिक बाजारपेठा अस्वस्थ आहेत तरीही टीसीएसने आपली कामगिरी उत्तम ठेवली आहे. भागधारकांना समाधानकारक डिव्हिडंड देऊन कंपनीने आपली परंपरा कायम राखली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आयटी बिझनेससाठी कठीण काळ सुरू असताना टीसीएस भविष्याची गरज ओळखून आपला बिजनेस आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अधिक बळकट करणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम प्रज्ञा यामुळे भविष्यात आयटी बिझनेसचे रूप बदलणार आहे. यासाठी डिजिटल पायाभरणी करण्याची गरज आहे, असेही चंद्रशेखरन म्हणाले. येऊ घातलेली 5G टेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑन थिंग्स (IOT) आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स यामुळे ग्राहक आणि कंपन्या दोघांसाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या अनुषंगाने कोणती प्रॉडक्ट डेव्हलप करावी लागतील यासाठी टीसीएस स्वतःची संशोधन करणारी टीम उभारणार आहे. स्टार्टअप आणि शिक्षण क्षेत्रात संस्थांबरोबर भागीदारी करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा