फेब्रुवारी महिन्याची सुरुवात भारतातील शेअर बाजारांसाठी अर्थसंकल्पातील काही सकारात्मक घोषणेने होईल अशी अपेक्षा होती. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बाजारांची कोंडी करणारा अर्थसंकल्प मांडला असे म्हणावे लागेल. निवडणुकीपूर्वी असलेल्या अर्थसंकल्पाचे कोणत्याही आकर्षक योजना नसणे हेच काय ते वैशिष्ट्य म्हणावे लागेल. यातून गुंतवणूकदारांसाठी आवर्जून लक्षात ठेवावेत असे दोनच मुद्दे मला जाणवले ते म्हणजे, भांडवली खर्चामध्ये कपात करण्याचा सरकारचा इरादा नाही. वर्ष २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकानंतर सत्तेत पुन्हा येण्याचा इरादा विद्यमान सरकारने स्पष्ट केलेलाच आहे. मात्र त्यानंतर भांडवली खर्चाला चाट लागेल असे भाकीत वर्तवले जात आहे. वित्तीय तूट नियंत्रित करण्यासाठी हे आवश्यक आहे असेही म्हटले जात आहे. पण सरकारची भूमिका पायाभूत सुविधांचे जाळे अधिक विस्तारण्याची राहणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा