- अतुल प्रकाश कोतकर
प्रत्येक गुंतवणूकदारांपुढील हा प्रश्न आहे. आधीच्या २०२२ सालात शेअर बाजाराने एका परिघात मार्गक्रमण केले. त्यामुळे समभागसंलग्न म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’द्वारे अथवा एकरकमी केलेल्या गुंतवणुका नकारात्मक किंवा जैसे थे परतावा दाखवत आहेत. तर दुसरीकडे बँकांनी मुदत ठेवींचे व्याजदर वाढविण्यास सुरुवात केल्याने रोखेसंलग्न योजनांची परतावा कामगिरीदेखील फारशी चांगली नाही. म्हणूनच सामान्य गुंतवणूकदारापुढे संभ्रम आहे. याला मुख्यत्वे दोन-तीन गोष्टी जबाबदार असू शकतात.
करोना विषाणूचा उपप्रकार असलेल्या ओमायक्रॉनचा २०२२ च्या सुरुवातीला प्रादुर्भाव, तर वर्ष संपताना चीनमध्ये करोनामुळे अवतरलेल्या लाटेमुळे जागतिक भय निर्माण केले होते. रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोविडपश्चात पूर्वपदावर येऊ घातलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला पुन्हा हादरे बसू लागले. त्यातूनच रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे खनिज तेलाच्या भावात भरमसाट वाढ होऊन त्याचे पर्यवसान महागाई वाढण्यात झाले. या अनैसर्गिक युद्धाचे गंभीर परिणाम आणि राजकीय ससेहोलपट अशा दुहेरी कात्रीत युरोप सापडला.
कोविड काळात देऊ केलेल्या प्रोत्साहनपर योजनांमुळे रोकडसुलभता वाढली. परंतु त्याचा परिणाम जगभरात महागाई वाढण्यात झाला. भारतात त्यामानाने महागाई नियंत्रणात राहण्यात आपल्यावरील आर्थिक संस्कार कामास आले असे म्हणण्यास वाव आहे. जोपर्यंत जागतिक स्तरावरील महागाई नियंत्रणात येत नाही तोवर वृद्धिक्षम आर्थिक धोरणे राबविणे कुठल्याही देशाला अशक्य आहे. सार्वकालिक उच्चांकी महागाईचा सामना करताना अमेरिका मेटाकुटीला आली आहे आणि त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात न भूतो न भविष्यति वाढ केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा