विद्यमान आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांनी बाजाराला निराश केले आणि तेव्हापासून घसरणीला सुरुवात झाली. कंपन्यांच्या समभागांचे बाजारभाव हे कंपन्यांच्या कमाईचे गुलाम असतात, (Stock prices are slave to earnings), असे म्हटले जाते.
राजकीय नेत्यांची किंवा अर्थतज्ज्ञांची विधाने बाजारात तात्पुरता जीव फुंकू शकतात. मात्र जोपर्यंत कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा होत नाही आणि तोपर्यंत समभागांच्या किमती वाढत नाहीत. लार्जकॅप कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीच्या निकालात थोडी सुधारणा असली तरी निर्देशांकवर जातील अशी परिस्थिती अजिबात नाही. कंपन्यांच्या कमाईने बाजार वरच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी अजून सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी जावा लागेल. याचा अर्थ सध्याची अस्थिरता पुढील डिसेंबर २०२५ पर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. दरम्यानच्या काळात नफ्यात वाढ दिसल्याशिवाय बाजारात सुधारणा आणि अस्थिरता कमी होईल असे वाटत नाही. सरकार रचनात्मक वित्तीय धोरणे निश्चित करणारा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. आता चालू आठवड्यात रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार आहे, त्याकडे सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. चालू खात्यातील तूट स्थिर, वित्तीय एकत्रीकरण, रिझर्व्ह बँकेला अपेक्षित असलेली चलनवाढ यासंबंधित आकडेवारी महत्त्वाची आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा