भारतात अगदी प्राचीन ऋगवेद काळापासून लोकायत, लोकायतिक, चार्वाक अशा विचारधारा ‘ईश्वर’ नावाची कोणती शक्ती अस्तित्वात नसल्याचे मानत आली आहेक. कात्यायनाने तर ‘अणुवाद’च मांडला, तर अणूखेरीज सृष्टीत दुसरे काहीच नाही, असा भौतिकवाद अडीच हजार वर्षांपूर्वी कणाद मुनी सांगून गेले. तरी प्रगत विज्ञान-तंत्रज्ञानाने चालित आजचे जग हे ढोबळ मानाने ईश्वराचे अस्तित्व मानतोच. अगदी अर्थशास्त्र, न्यायशास्त्रासारख्या मानव्य विद्यांमध्ये ‘ॲक्ट ऑफ गॉड’ (दैवी कोप) याला एक गर्भित अर्थ आहे. अशक्यतेच्या परिघातील किंवा अशा अव्यवहार्य गोष्टी ज्याची कारणमीमांसा करणे अवघड जाते तेव्हा बचावरूपाने हे घडून येते. हाच विधिमान्यता असलेला ‘देवा’चा (ॲक्ट ऑफ गॉड) धावा आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही मागे केला होता. आठवा तो करोना महासाथीचा काळ आणि तेव्हाचा अर्थमंत्र्यांचा तो बचाव! त्यावर बरीच टीका झाली, खिल्लीही उडवली गेली. पण त्यांचा तो गर्भित बचाव बेगडी की, ईश्वरावरील त्यांची श्रद्धा नकली हा एक अनुत्तरीत प्रश्न उरतोच. असो, पण अशा ईश्वराधनेचा आधुनिक व्यापार जगतातील प्रत्यय म्हणजे ‘एजंल इन्व्हेस्टर – Angel Investor’ अर्थात देवदूत गुंतवणूकदार होय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा