करिअरची दिशा ठरवताना कामाच्या संधींचा विचार केला जातो, तेव्हा सरकारी किंवा खासगी नोकरी, स्वतंत्र व्यवसाय आणि स्वयंसेवी संस्था हे चार मुख्य पर्याय समोर असतात. प्रत्येक पर्यायाची बलस्थानं आणि मर्यादांचा विचार करून, आपल्यासाठी काय योग्य ठरेल याचा निर्णय घेतला तर गोंधळलेपण कमी होऊ शकतं.
‘सरकारी नोकरीत अधिकार केवढा असतो. पुन्हा पेन्शन, वेगवेगळे भत्ते, अधिकारामुळे आपोआप चालत येणारे फायदे. सरकारी नोकरीएवढं सुखाचं काहीच नाही. एमपीएससी, यूपीएससीच्या परीक्षा तू अवश्य दे.’
‘सरकारी नोकरी करायची म्हणजे भ्रष्टाचाराची तयारी पाहिजे. लायकी नसलेल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागते. विरोध करण्याची शक्ती लागते. ठरव बुवा, काय करायचं ते.’
‘आपल्याला कुणाचं बॉसिंग नको. लाथ मारीन तिथं पाणी काढीन एवढी हिंमत आहे आपल्यात. मी स्वतंत्र व्यवसायच उभा करणार. नोकरी करावी लागण्यासारखं दुर्दैव दुसरं नाही.’
‘मराठी माणसानं धंदा करायचा म्हणजे बुडायचीच खात्री जास्त. बघ बुवा, कष्ट फार पडतात, शांतताच नसते डोक्याला.
‘कॉर्पोरेट कंपनी किंवा आयटी. मग चिंता नाही. राबावं लागतं पुष्कळ, पण परदेशी वाऱ्या, मोठी मोठी पॅकेजेस..’
‘नको बाबा ती आयटीतली नोकरी. दिसायला चकचकाट आहे, पण दिवस-रात्र मशीनसोबत. माणसांशी बोलायलासुद्धा वेळ नसतो.’
‘देशाचं, समाजाचं आपण काही देणं लागतो, याचं भान आजकाल कमी झालंय. सर्व काही शोषणावर आधारलेलं आणि श्रीमंतांच्या हातात. गरिबांकडे ना सत्ता, ना पसा. ‘एनजीओ’शिवाय ही दरी कमी होणारच नाही. प्रस्थापितांना विरोध करणारं कुणीतरी हवंच.’
‘आजकाल एनजीओ आणि कॉर्पोरेट कंपनीमध्ये काही फरकच राहिला नाहीये. गरिबांचा कैवार हे चलनी नाणं झालंय.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा