● माझं २० वर्षे वय पूर्ण. २०२० मध्ये ९७ टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण झालो. पुढे २०२२ ला इयत्ता बारावी पीसीएमबी ८४.३ गुणांसह उत्तीर्ण झालो. २०२२ पासून ते आज पर्यंत नीट चे क्लास करत होतो कुठेही अॅडमिशन घेतली नाही. मागील एक वर्षापासून मानसरोग तज्ञाकडे ट्रीटमेंट चालू आहे. कधीपर्यंत चालेल सांगता येत नाही. नीट ला १६७ मार्क्स आल्यामुळे ते क्षेत्र सोडण्याचे ठरवले आहे. सीईटी- पीसीएम म्हणजेच इंजिनीयरिंगची परीक्षा दिलेली आहे. आता समोर दोनच ऑप्शन आहेत एक तर कॉम्प्युटर सायन्स इंजिनीयरिंग किंवा केमिकल इंजिनिअरिंगला अॅडमिशन घेऊन यूपीएससीची तयारी करणे किंवा फर्ग्युसन कॉलेजला बीएस्सी केमिस्ट्रीला अॅडमिशन घेऊन यूपीएससीची तयारी करणे. दोन्हीपैकी कुठला ऑप्शन निवडावा या संभ्रमात आहे. दोन्हीपैकी कुठेजरी अॅडमिशन घेतले तरी कॉलेज मात्र पुण्यातच हवे व यूपीएससीसाठीचा क्लास चाणक्य मंडळ, पुणे येथे लावण्याचे ठरवले आहे. आपणास काय वाटतं दोन्हीपैकी कुठला ऑप्शन चांगला राहील? —सार्थक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा