दहावी, बारावीचा निकाल लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची तयारी सुरू आहे ती प्रवेशाची. कुठे प्रवेश घ्यायचा, कोणती शाखा निवडायची किंवा विचार केला होता एक आणि निकाल लागला अनपेक्षित, असे काहीसे होते. त्यात अनेकदा पालकांच्या अपेक्षांचे ओझे वाहताना मुलांना ताण येतो. अनेक जणांना अपेक्षांचे ओझे पेलवत नाही आणि त्यातून मुलं आत्मविश्वास गमावतात, कधी त्यांना अटी ताणामुळे नको ती पावले उचलण्यात परिणती होते. हे टाळण्यासाठी पुढील काही उपाय केल्यास ताण निवळून, उत्साहाने पुढील प्रश्नांना, समस्यांना सामोरे जाता येते.

मुलांशी सुसंवाद हवा

no decision from maha government on mahajyoti withdraw from uniform policy process
‘समान धोरण’मुळे लाखो विद्यार्थी वंचित; ‘महाज्योती’ बाहेर पडल्यानंतर सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Kerala Ban On Digital Notes
Kerala Ban On Digital Notes : आता पालकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर येणार नाही मुलांचा गृहपाठ, डिजिटल स्वरुपातील नोट्सवर बंदी; ‘या’ राज्याने घेतला निर्णय!
Commercial Pilot License Holder ppl Cpl airplan career news
चौकट मोडताना: अनुभवानंतरचे शहाणपण
Srikanth Kulkarni
माझी स्पर्धा परीक्षा: आर्थिक स्वावलंबनामुळे मानसिक ताणातून सुटका
success story of Diganta Das owner of Daily Fresh Food
Success Story : शून्यातून शिखरापर्यंत…! कामगार ते स्वतःचा ब्रँड; वाचा पराठ्यांचा व्यवसाय सुरू करणाऱ्या दास यांचा प्रवास
Admission to medical courses will be held even on holidays
वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश सुट्टीच्या दिवशीही होणार
Best time for Job Hunting
Best time for Job Hunting : कोणत्या महिन्यांमध्ये नोकरी शोधावी? जाणून घ्या, नोकरी शोधण्याची सर्वोत्तम वेळ

’     मुलांनी आणि पालकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की हल्ली यशाच्या अनेक पायऱ्या असतात. एका पायरीवरून घसरून पडलो तर इतर पायऱ्या तयार आहेत. केवळ एका पायरीवर विसंबून चालणार नाही. थोडक्यात, अनेक पर्याय आणि संधी आता करिअरच्या बाबतीत उपलब्ध आहे. त्यामुळे एक संधी हुकली म्हणून वाईट न वाटून घेता पुढच्या संधीकडे पहा.

’     गुण म्हणजे चढ-उतार. आयुष्यात प्रत्येक गोष्टीत जसे चढउतार असतात तसे ते परीक्षेतही होतात. पण, पालकांनी साथ दिली तर एकूण यश सरासरीजवळ राहणार. एखाद्या परीक्षेत गुण कमी पडले तर आयपीएलच्या अनेक मॅचपैकी एक गमावली असे समजायाचे आणि पुढे जायचे.

’    विद्यार्थ्यांच्या दहावी-बारावीच्या परीक्षेची गुणपत्रिका आपण ‘फ्रेम’ करून लावत नसतो. कारण त्या पुढेही आपले शिक्षण आणि यश-अपयश सुरूच असते. तसेच, आयुष्याच्या परीक्षेत किंवा एक चांगले व्यक्तिमत्व घडवताना किंवा घडवल्यानंतर ही कुणी दहावी-बारावील किती गुण होते याची चौकशी करीत नाही. त्यामुळे, परीक्षेच्या गुणांविषयीचे हे भ्रम आपण दूर केले पाहिजे.

’     पालकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की आपण मुलांना बदलू शकत नाही. तसेच, मुलांनाही पालकांना बदलता येत नाही. मूल जन्माला येते तेव्हा ते गुणपत्रिका घेऊन येत नाही. पालकांचा मुलांशी चांगला संवाद असेल, त्यांचा त्यांच्यावर विश्वास असेल तर असे मूल आयुष्यात नक्कीच उभे राहणार. आपला मुलावर विश्वास आहे, याची जाणीवही पालकांनी मुलाला करून दिली पाहिजे. मग नक्कीच चांगले प्रयत्न करीत राहतात.

’    मुलांनीही स्पष्टपणे आपला अभ्यास किती झाला आहे, पेपर कसा सोडविला आहे, हे स्पष्टपणे पालकांना सांगितले पाहिजे. म्हणजे पालकांच्या अपेक्षाही वाढत नाहीत. नाही तर वाढलेल्या अपेक्षांचे ओझे शेवटी मुलांनाच वाहावे लागते.

’    आपल्या मुलाला एखाद्या परीक्षेत कमी गुण मिळाले असतील तर त्याची लाज पालकांनी बाळगू नये. कारण, परीक्षेतील गुणांच्या आधारे ठरणारी प्रतिष्ठा ही एक ‘फॅन्टसी’ आहे.