solapur farmer’s Success Story : आपला देश कृषी प्रधान देश आहे . भारतात जास्तीत जास्त लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून व्यवसाय किंवा नोकरी करता. कधी पिकवलेल्या पिकांपासून शेतकऱ्यांचा फायदा होतो तर कधी तोटा होतो तरीसुद्धा हार न मानता शेतकरी शेतामध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसतात. (solapur farmer Cultivated coriander in sugarcane farm and earned 50 thousand rupees in just 3 days)

सध्या कोथिंबीरचे भाव वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूरच्या एका शेतकऱ्याने एक अनोखा प्रयोग केला आणि हा प्रयोग यशस्वी सुद्धा ठरला. या शेतकऱ्याने त्याच्या ऊसाच्या शेतात आंतरपीक म्हणून कोथिंबीरची लागवड केली आणि फक्त तीन दिवसामध्ये ५० हजार रुपयांची कमाई केली. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरंय. सध्या या शेतकऱ्याची आणि त्याच्या या नवीन प्रयोगाची चांगलीच चर्चा सुरू आहे.

Odisha army officers fiance sexual assault news
लष्करातील जवानाच्या होणाऱ्या पत्नीचा पोलीस ठाण्यातच लैंगिक छळ, दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पाच जण निलंबित
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
The death of EY employee Anna Sebastian Perayil sparked outrage over company work conditions
EY Employee Death : कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झालेल्या तरुणीच्या आईसाठी कंपनीच्या अध्यक्षांचं पत्र, म्हणाले, “मी ही एक बाप…”
Tirupati Laddu Revenue in Marathi
Tirupati Laddu Revenue: जनावरांच्या चरबीचा प्रसादात वापर; लाडू विकून तिरुपती मंदिराला किती महसूल मिळतो?
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
husband wife fight woman jump in naini lake
“जीव एवढा स्वस्त असतो का?” पतीबरोबर वाद अन् झालं होत्याचं नव्हतं; रागावलेल्या पत्नीने तलावात मारली उडी अन्…; पाहा video
Ajit Pawar Amol Kolhe
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…

हेही वाचा : मोजे विकतो म्हणून लोकांनी मारले टोमणे, पण जिद्दीने सुरु केला स्वतःचा व्यवसाय; वाचा कोट्यधीश कपिल गर्ग यांचा संघर्षमय प्रवास

सोलापूरच्कोया शेतकऱ्याने कोणता नवीन प्रयोग केला?

सध्या कोथिंबीरचे दर बाजारात चांगलेच वाढले आहेत. कोथिंबीरची एक पेंढी ५० ते ६० रुपयांना विकली जात आहे. हे पाहून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याच्या हराडवाडी गावामध्ये राहणाऱ्या शेतकरी लक्ष्मण दत्तात्रय शेळके यांनी ऊसाच्या शेतात आंतरपीक म्हणून ३० ते ३५ किलो धने लावून कोथिंबीरची लागवड केली . त्यानंतर त्यांनी बाजारात जाऊन स्वत: एक पेंडी ५० ते ६० रूपयांना विकली. यातून त्यांनी फक्त तीन दिवसांमध्ये ५० हजार रुपयांची कमाई केली.

हेही वाचा : लंडनमध्ये घेतलं बीबीएचं शिक्षण अन् सगळं सोडून धरली शेतीची वाट; वाचा वर्षाला कोटींची उलाढाल करणाऱ्या हर्षित गोधा यांची यशोगाथा

उन्हाळ्यात अनेक शेतकऱ्यांना कोथिंबीरची लागवड करताना अडचणी येतात. लक्ष्मण यांनी लागवड करताना ही बाब लक्षात घेऊन पाईपद्वारे या कोथिंबिरीला पाणी दिल. त्यामुळे मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात त्यांच्या कोथिंबिरीला पाणी पडत राहिल्याने पीक चांगले आल्याचे ते म्हणाले. शेतकरी लक्ष्मण शेळके यांच्या मते, कोथिंबीरचा हाच भाव कायम राहिला तर कोथींबीर विक्री पासून १ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

शेतकरी लक्ष्मण शेळके यांच्या प्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या शेतात कोथिंबीरची लागवड करू शकता आणि भरघोस नफा मिळवू शकता.