या लेखात आपण प्राचीन भारताच्या इतिहाचा यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने आढावा घेणार आहोत.मध्ययुगीन भारताचा इतिहास लक्षात घेता; त्यामानाने प्राचीन भारताच्या इतिहासावर अधिक प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती आपणास दिसून येते. त्यामुळे या विषयावर भर देणे अपेक्षित आहे. बहुतेक विद्यार्थी या विषयाला गांभीर्याने घेताना दिसून येत नाहीत किंवा ते तेवढ्यापुरते शॉर्टकट शोधून अभ्यास करतात. परंतु २०२०, २०२३, २०२२, २०२१ व २०१६ ही पूर्वपरीक्षा बघितली तर त्यात अनुक्रमे १०, ९, ८, ७, ७ इतके प्रश्न विचारलेले दिसून येतात. ही संख्या पूर्वपरीक्षेत यश मिळविण्याच्या दृष्टीने नक्कीच महत्त्वाची आहे. प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासताना या विषयाचा अभ्यासक्रम समजून घ्या. त्यावर विचारलेले प्रश्न व त्यांचे स्वरूप लक्षात घेवून त्यानुसार स्वत:च्या नोट्स काढा. जुने व नवे (थीम्स) एनसीआरटी यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा