UPSC Essentials: स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखांची मालिका सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. या लेखात, पौराणिक कथा आणि संस्कृती या विषयात पारंगत असलेले प्रख्यात लेखक देवदत्त पट्टनायक यांनी भारतीय समृद्ध व्यापाराचा इतिहास मांडला आहे. भारताचे उपखंडातील संस्कृतींशी जमीन आणि समुद्रमार्गे संबंध होते. खुष्कीच्या मार्गाने हिंदुकुश पर्वत ओलांडून भारताचा संबंध पर्शिया (आजचा इराण) आणि मध्य आशियाशी होता. समुद्रमार्गे पर्शिया, अरब आणि लाल समुद्राद्वारे रोमन साम्राज्याशी भारत जोडला गेला होता.
भारताचे पूर्व किनाऱ्यावरून श्रीलंका, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया, आणि बर्मा यांच्याशी संबंध होते. तसेच पर्वतांमधून जाणाऱ्या मार्गाने भारत तिबेटशी जोडला गेला होता. भारतीयांनी मान्सूनच्या वाऱ्यांचा फायदा घेतला, त्यामुळे जहाजे सहा आठवड्यांत गंतव्यस्थानी पोहोचू शकत होती. हा प्रवास जमिनीवरून केल्यास सहा महिने लागत होते. या मार्गांद्वारे भारताने जगाला अनेक गोष्टी दिल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा