सागर भस्मे

Trivartha Climate classification In Marathi : हवामान वर्गीकरण हे शास्त्रज्ञ, भूगोलशास्त्रज्ञ आणि संशोधकांनी जगभरातील विविध हवामान परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी वापरलेले एक मूलभूत साधन आहे. त्रिवार्था हवामान वर्गीकरण, ज्याला त्रिवार्था प्रणाली म्हणूनही ओळखले जाते. हा एक त्रिगुणात्मक दृष्टिकोन आहे, जो तीन प्रमुख मापदंडांवर आधारित हवामानाचे वर्गीकरण करण्याची एक व्यापक पद्धत प्रदान करतो. या लेखात, आपण त्रिवार्था हवामान वर्गीकरण प्रणाली, तिची कार्यपद्धती आणि तसेच भारतातील हवामान समजून घेण्यासाठी कशा प्रकारे उपयोगी पडते हे समजून घेऊ या.

Patangrao Kadam memorial site will be inaugurated tomorrow print politics news
डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिस्थळाचे उद्या लोकार्पण; राहुल गांधी यांची उपस्थिती
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
iit bombay researchers discover with help of robots how animals find their way back home
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन
low cost and small cars are necessary in India says maruti suzuki chief rc bhargava
कमी किमतीच्या छोट्या मोटारी देशासाठी आवश्यकच!; मारुती सुझुकीचे अध्यक्ष भार्गव यांचे प्रतिपादन
private guards stopped tourists for taking rare bird photo at wetland near palm beach road
पाणथळ जागेवर छायाचित्रणास मज्जाव! नवी मुंबईत विकासकाच्या सुरक्षारक्षकांकडून पर्यावरणप्रेमींची अडवणूक
state bank of india fd marathi news
बँकांच्या ठेवींमध्ये घट हे सांख्यिकी मिथक! स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांचे प्रतिपादन

भारतीय हवामान क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या सर्व वर्गीकरणांमध्ये त्रिवार्थाचे वर्गीकरण अधिक समाधानकारक असून त्रिवार्थाचे वर्गीकरण हे कोपेनच्या वर्गीकरणाची सुधारित आवृत्ती आहे. त्रिवार्था यांनी संपूर्ण भारताची विभागणी A, B, C आणि H चार प्रकारांत केली आहे.

  • A – उष्णकटिबंधीय आर्द्र हवामान.
  • B – उच्च तापमान पण कमी पाऊस असलेले कोरडे हवामान.
  • C – कमी तापमानासह कोरडे हिवाळी हवामान.
  • H – पर्वतीय हवामानाचा सूचक आहे.

A , B आणि C यांचे पुन्हा सात प्रकारामध्ये उपविभाजन केले जाते.

उष्ण कटिबंधीय पर्जन्य वन (AM)

ही जंगली पश्चिम किनारपट्टीवरील मैदाने, सह्याद्री आणि आसामच्या काही भागांत आढळतात. या प्रदेशाचे तापमान नेहमी जास्त असते आणि हिवाळ्यात ते कधीही १२.२० वर्षाच्या खाली जात नाही. एप्रिल आणि मेमध्ये तापमान २९ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. दोन्ही महिने या प्रदेशातील सर्वात उष्ण महिने मानले जातात.

उष्ण कटिबंधीय सॅव्हाना हवामान प्रदेश (AW)

पश्चिम घाटातील पश्चिम उतार व किनाऱ्यावरील मैदानी प्रदेशात या प्रकारचे हवामान आढळते. हिवाळ्यात येथील सरासरी तापमान १८.२° सेल्सिअस आणि उन्हाळ्यात ३२° सेल्सिअस असून येथील तापमान कधी-कधी ४६° ते ४८° सेल्सिअसपर्यंत पोहोचते. साधारणतः या प्रदेशामध्ये जून ते सप्टेंबरपर्यंत पाऊस पडतो, जरी दक्षिणेकडे तो डिसेंबर अखेरनंतरही चालू राहतो.

उष्ण कटिबंधीय गवताळ स्टेफी प्रदेश (BSw)

जास्त पर्जन्यमान असलेल्या या हवामान क्षेत्रात मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि पश्चिम आंध्र प्रदेश यांचा समावेश होतो. या प्रदेशामध्ये तापमानाचे वितरण विषम असून डिसेंबरमध्ये २०° ते २३° सेल्सिअस आणि मे मध्ये ३२.८° सेल्सिअसपर्यंत असते. हे दोन्ही महिने या प्रदेशातील अनुक्रमे सर्वात थंड आणि उष्ण महिने आहेत. येथे वार्षिक पर्जन्य ४० ते ७५ सेंटिमीटरपर्यंत असून त्यामुळे हा प्रदेश भारतातील दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.

उप-उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश (BSh)

या प्रदेशामध्ये पंजाब, थारचे वाळवंट, उत्तर गुजरात आणि पश्चिम राजस्थान यांचा समावेश होतो. येथे जानेवारीमध्ये तापमान १२° सेल्सिअस आणि जूनमध्ये ३५° सेल्सिअस दरम्यान राहते. हे दोन्ही महिने अनुक्रमे वर्षातील सर्वात थंड आणि उष्ण महिने आहेत. येथे कमाल तापमान ३९° सेल्सिअसपर्यंत पोहोचते. येथे पाऊस ३०.०५ ते ६३.०५ सेमी पर्यंत असतो आणि तो खूप अनियमित असतो.

उष्ण कटिबंधीय शुष्क हवामान किंवा वाळवंट (Bwh)

हे हवामान राजस्थानच्या बाडमेर, जैसलमेर आणि बिकानेर जिल्ह्यात आणि कच्छच्या काही भागात आढळते. सरासरी तापमान जास्त असून मे आणि जून हे सर्वात उष्ण महिने आहेत. हिवाळ्यात उत्तरेकडे तापमान कमी होत जात असून वार्षिक पर्जन्यमान सरासरी ३०.५ सेंटिमीटर आहे. परंतु काही भागात १२.७ सेंटिमीटर इतका कमी पाऊस पडतो.

थंड / आर्द्र उपोष्ण कटिबंधीय हवामान (Caw)

या प्रकारचे हवामान हिमालयाच्या दक्षिणेकडील मोठ्या भागात तसेच तरी पंजाब ते आसामपर्यंत आढळते. याशिवाय राजस्थानमधील अरवरी पर्वतरांगेच्या पूर्वेलाही या प्रकारचे हवामान आढळते. येथील हिवाळा सौम्य असून पश्चिम भागात उन्हाळा अत्यंत उष्ण परंतु पूर्वेला सौम्य असतो. मे आणि जून सर्वात उष्ण महिने आहेत.

आर्द्र पर्वतीय हवामान

या प्रकारचे हवामान हिमालयात सहा हजार मीटर किंवा त्यापेक्षा जास्त उंची असलेल्या डोंगराळ भागातील सर्व हिमालय राज्यात आढळते. सर्वच महिन्यातील तापमानावर भूपृष्ठाच्या स्वरूप उताराचा प्रभाव असून पश्चिम हिमालयाच्या उत्तरेस असलेल्या ट्रान्स हिमालयातील पट्ट्यात कोरडे आणि थंड हवामान आहे, विखुरलेल्या आणि अविकसित प्रकारच्या वनस्पती या प्रदेशात आढळतात. हिवाळा खूप थंड व पाऊस अपुरा असून दैनंदिन आणि वार्षिक तापमान जास्त राहते.