सागर भस्मे

मागील काही लेखांतून आपण भारतातील हवामान वर्गीकरणाविषयीची माहिती घेतली. या लेखातून आपण समुद्रकिनाऱ्यावर उदभवणाऱ्या नुकसानकारक लाटांबद्दल म्हणजेच त्सुनामीबाबत जाणून घेऊ या. त्सुनामी हा जपानी शब्द ‘त्सू’ म्हणजे बंदर आणि नामी म्हणजे लहर यावरून आला आहे. आपत्ती व्यवस्थापनावरील उच्चाधिकार समितीच्या अहवालानुसार (२००१) भूकंप, भूस्खलन किंवा ज्वालामुखीचा उद्रेक यांसारख्या समुद्रातील एखाद्या घटनेमुळे निर्माण होणारी त्सुनामी ही महाकाय लाट आहे. त्सुनामी ही एकच लाट नसून समुद्राच्या तळाजवळ किंवा खाली भूवैज्ञानिक बदलांमुळे निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका आहे. या लाटा प्रचंड आकार धारण करू शकतात आणि त्या महासागर ओलांडून जमिनीवर पोहोचतात.

researchers at iit bombay suggested measures to deal with future economic crises
नैसर्गिक आपत्तीमुळे भविष्यात आर्थिक संकट; आयआयटी मुंबईने सुचविल्या उपाययोजना
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ghost Island Caspian Sea
Ghost Island: कॅस्पियन समुद्रातील ‘भुताटकीचं बेट’ नेमकं कुठे नाहीस होतं?; नेमकं काय घडतंय?
biggest iceberg in the world
जगातील सर्वांत मोठा हिमखंड ‘या’ बेटावर धडकणार? याचे परिणाम किती विध्वंसक?
Bandra Worli sea bridge coastal raod will be inaugurated by CM Fadnavis on Republic Day
सागरी किनारा मार्ग पूर्णक्षमतेने सुरू होणार, सागरी किनारा आणि वरळी वांद्रे सागरी सेतू जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी लोकार्पण
Fossils of single celled organisms
कुतूहल : एकपेशीय सजीवांचे जीवाश्म
Beach tourism, Sand mining, Vasai, tourism,
समुद्रकिनारा पर्यटन धोक्यात, वसईत वाळू उपसा सुरूच; प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप
Birds were counted at Tansa and Modaksagar Lakes by International Wetland and Forest Department
तानसा अभयारण्यात पक्षी गणना, ७५ पक्ष्यांची नोंद

त्सुनामीची निर्मिती :

१) समुद्राखालील भूकंप (Undersea Earthquakes) : भूस्खलन, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा महासागरावर पडणाऱ्या मोठ्या उल्कापिंडाच्या प्रभावामुळे त्सुनामी उदभवू शकते. परंतु, बहुतेक विनाशकारी त्सुनामी समुद्राखालील भूकंपांमुळे निर्माण होतात; ज्यांचा केंद्रबिंदू फॉल्ट लाइनजवळ किंवा ५० किमीपेक्षा कमी खोलीवर होतो. जेव्हा दोन अभिसरण करणाऱ्या भूपट्टी (Lithospheric Plates) एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा हलक्या प्लेटच्या खाली जड प्लेट दबली जाते आणि शिलावरणाचे विस्थापन सबडक्शन झोनमध्ये होते. या प्रक्रियेदरम्यान भूकंप होतो; ज्यामुळे ‘त्सुनामी’ येते.

२) भूस्खलन (Landslides) : भूस्खलन, तसेच खडकांचे कोसळणे, बर्फाचे कोसळणे (Avalanches) इत्यादींमुळे समुद्रातील पाण्याचे विस्थापन झाल्यामुळे त्सुनामी लाटा निर्माण होतात. १९८० च्या दशकात दक्षिण फ्रान्सच्या किनारपट्टीवर विमानतळाच्या धावपट्टीच्या बांधकामामुळे पाण्याखाली भूस्खलन झाले. त्यामुळे थेब्स बंदरात विनाशकारी त्सुनामीच्या लाटा उसळल्या. समुद्राच्या तळाला भूकंप होऊन पाण्याखाली भूस्खलन होते. त्यामुळेदेखील त्सुनामी तयार होते.

३) ज्वालामुखीचा उद्रेक (Volcanic Eruptions) : जेव्हा जेव्हा समुद्राखाली ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा तेव्हा समुद्राच्या पाण्याचे अचानक विस्थापन होते आणि त्सुनामीच्या लाटा तयार होतात. इंडोनेशियातील क्राकाटोआच्या ज्वालामुखीचा स्फोट २६ ऑगस्ट १८८३ रोजी नोंदवलेल्या सर्वांत मोठ्या आणि सर्वांत विनाशकारी त्सुनामींपैकी एक होता. या स्फोटामुळे सुमारे ४० मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या; ज्याने जावा व सुमात्रा या दोन्ही बेटांमधील सुंदा सामुद्रधुनीलगतच्या किनारपट्टीच्या भागात विनाशात्मक परिस्थिती निर्माण केली आणि त्यामुळे ३६,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

४) उल्का आणि लघुग्रह (Meteorites and Asteroids) : समुद्रात उल्का आणि लघुग्रह पडून त्सुनामी निर्माण होण्याचा संभाव्य धोका असतो.

त्सुनामींचा प्रसार (Propagation of the Tsunami) :

त्सुनामीमध्ये खूप लांबलचक लाटांची मालिका असते; जी महासागराच्या पृष्ठभागावर त्यांच्या उत्पत्तीच्या ठिकाणापासून सर्व दिशांनी जाते. त्यांची हालचाल तळ्यात गारगोटी टाकून निर्माण झालेल्या तरंगांसारखी असते. खोल समुद्रात त्सुनामी खूप वेगाने प्रवास करतात (म्हणजे ५००-८०० किमी प्रतितास), जेवढा जेट विमानाचा वेग असतो. त्यांची तरंगलांबी (Wavelength) खूप लांब असते; जी अनेकदा ५००-७०० किमीपेक्षा जास्त असते.
भौतिकदृष्ट्या ते पुढे दिलेल्या गतीने लांब लाटा म्हणून प्रसारित करतात –

त्सुनामीची गती = (पाण्याची खोली x गुरुत्वाकर्षण प्रवेग)^१/२

त्सुनामी महासागराचे खोल पाणी सोडून उथळ पाण्याच्या दिशेने प्रवास करीत असताना त्यांचे दोन प्रकारे रूपांतर होते. प्रथमतः त्यांचा वेग बराच कमी होतो आणि दुसरे म्हणजे ते १० मीटरपेक्षा जास्त उंची गाठतात. कधी कधी त्या ३० मीटर उंचीपर्यंत पोहोचतात.

हिंदी महासागरातील त्सुनामी (Tsunamis in the Indian Oceans) :

हिंदी महासागरात अनेक वेळा त्सुनामी निर्माण झाल्या आहेत. १८८३ मध्ये क्राकाटोआच्या ज्वालामुखी उद्रेकाने त्सुनामीला उत्तेजन दिले; ज्यामुळे इंडोनेशियाच्या जावा व सुमात्रा बेटांवर ३६ हजार लोक मारले गेले. १८८० मध्ये भूकंप झाला; ज्याचा केंद्रबिंदू बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी होता, तेव्हाही त्सुनामीची नोंद झाली. १६ जून १८१९ च्या कच्छच्या भूकंपामुळे त्सुनामी आली; ज्यामुळे किनारी भाग बुडाला आणि मच्छीमारांच्या बोटींचे मोठे नुकसान झाले. तेव्हा २४ किमी लांबीचे जमिनीचे क्षेत्र भूकंपामुळे उदभवलेल्या टेक्टोनिक हालचालीमुळे वरच्या दिशेने आले; जेथे अनेक जण मरून पडले होते, तसेच अडकलेल्या अनेक लोकांना आश्रय मिळाला होता. तेव्हापासून लोक या वर आलेल्या जमिनीला ‘अल्लाहचा बंध’ (Allah’s Bund) (देवाने तयार केलेला बांध), असे म्हणतात. २६ डिसेंबर २००४ रोजी हिंद महासागराला त्सुनामीचा तडाखा बसला होता. रिश्टर स्केलवर ८.९ तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे ही त्सुनामी उद्भवली होती.

Story img Loader