सागर भस्मे

लोकशाही राज्यकारभारात कार्यक्षम व प्रभावी प्रशासनाची हमी देणे म्हणजे सुशासन होय. सुशासनाची संकल्पना भ्रष्टाचाराला संस्थात्मक बंधने आणि कामकाजाच्या बाजार अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार परिभाषित केली गेली आहेत. जागतिक बँकेने १९९२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या शासन प्रक्रिया व विकास या अहवालात असे स्पष्ट केले आहे की, शासन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सुशासनासाठी जाणीव-पूर्वक प्रयत्न करावे लागतात. नागरिकांनी सुशासनाची मागणी केली पाहिजे. शासनाने नागरिकांच्या मागण्यांना योग्य प्रतिसाद दिला पाहिजे. भारताने सुशासनाच्या संदर्भात माहितीचा अधिकार, नागरिकांची सनद, ई-शासन, आधार, मनरेगा या योजना आणि धोरणांच्या माध्यमातून सुशासानाच्या दिशेने महत्त्वाची पावले टाकलेली आहेत.

How to watch Apple iPhone 16 launch event
Apple Event 2024 : आयफोन १६ ची किंमत किती असणार? वेळ, तारीख अन् कुठे बघता येईल लाइव्ह जाणून घ्या
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Paris Paralympics 2024 | what is the meaning of The Agitos Logo
Paralympics 2024 : पॅरालिम्पिक लोगोचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या, काळानुसार लोगो कसा बदलला?
kajal Surma
सुरमा म्हणजे काय? जाणून घ्या काजळ आणि सुरमा मधील फरक
fixed dose combination drugs
Fixed Dose Combination Drugs : ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ औषधं म्हणजे काय? सरकारने अशा १५६ औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय का घेतला?
constitution
संविधानभान: धन विधेयकाची वैशिष्ट्ये
Badlapur Sexual Assault Case Mrunmayee Deshpande and Akshay Kelkar Reaction on Badlapur case
“माणूस म्हणून नक्की कुठे जातोय आपण?” बदलापूर अत्याचार प्रकरणावर भडकली मृण्मयी; अक्षय केळकर म्हणाला, “कुठल्या तोंडाने…”
What are VVPAT and Importance of VVPAT in marathi
VVPT : VVPAT म्हणजे नेमकं काय? निवडणूक प्रक्रियेत ही मशीन का महत्त्वाची?

संयुक्त राष्ट्रांनी सुशासन संकल्पनेची व्याख्या केली आहे. त्यात त्यांनी ‘पारदर्शकता’ व ‘कायद्याचे राज्य’ हे सुशासनासाठी आवश्यक मुद्दे मानले आहेत. ‘पारदर्शकता’ हा मुद्दा भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. कोणत्याही स्तरावर भ्रष्टाचार असता कामा नये, सर्वसामान्य नागरिकाची पिळवणूक राज्य यंत्रणेकडून होऊ नये आणि त्याचे जे हक्क आहेत, ते त्याला विनासायास मिळावेत ही अपेक्षा त्यामागे आहे.

सुशासन निर्माण होण्यासाठी सर्वच पातळ्यांवर जनता आणि प्रशासनातील समन्वय खूप महत्त्वाचा आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘सुशासन दिवस’ साजरा केला जातो. नागरिक, शासन व प्रशासन हा त्रिकोण जास्तीत जास्त सशक्त करणे गरजेचे असून, त्या दृष्टीने सरकारी यंत्रणा सतत कार्यरत असते. अधिकारी आणि कर्मचारी सर्व प्रकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.

स्वीकार्यता आणि सक्षम सार्वजनिक सेवा, उत्तरदायी निर्णयव्यवस्था या आधारे राजकीय संस्थांनी समाजात विविध हितसंबंध गुंतवून सर्वसाधारण जनमानस प्रभावीपणे प्रोत्साहित केले पाहिजे. मजबूत नागरी समाजाचे महत्त्व यावर जोर दिला पाहिजे. ही सुशासनाकडून अपेक्षा आहे. अर्थसंकल्पीय अनुशासनाला बळकट करणे, गैरसरकारी संघटनांचा वापर करणे, सामाजिक उद्दिष्टे, न्याय आणि पर्यावरणीय संरक्षणासह इतर संघटनांचा वापर करून सार्वजनिक क्षेत्रात सुधारणा करण्यास प्रोत्साहन द्यावे, असेही सुशासनात गृहीत धरले जाते. सार्वजनिक क्षेत्रांचे व्यवस्थापन (Public Sector Management), शासनाचे उत्तरदायित्व (Accountability of Governance), विकासाचे कायदेशीर प्रारूप (Legal Framework & Transparency), माहिती व पारदर्शकता (Information & Transparency) ही ती चार वैशिष्ट्ये होत.