जवळजवळ सर्वच नद्यांनी रौद्ररूप धारण करून, सर्व काही गिळंकृत करून सर्वत्र हाहाकार माजविलेला असताना प्रतिकूल परिस्थितीतही गावातील लोकांच्या मदतीने जेवण शिजवून दररोज सुमारे ९०० ते १००० लोकांच्या मुखी घास भरवण्याचं मोलाचे कार्य पुष्पा चौहान नावाच्या महिलेने केले, ही निश्चितच कौतुकास्पद अशी बाब आहे. अर्थात, याचे श्रेय तिच्याबरोबरच गणेशपूर या गावालाही जाते. पुरस्कारासाठी याचा विचार होणे आवश्यक वाटते.
पूर्वी गावागावातून अशा प्रकारचे ‘गावपण’ जपले जात होते. सुख-दु:खाच्या प्रसंगाबरोबरच काही नैसर्गिक आपत्तीच्या वेळीदेखील हे ‘गावपण’ जपले जात असताना दिसून येत होते, आता मात्र राजकारणामुळे ही स्थिती राहिलेली नाही, कारण कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवली असताना ‘श्रेय’ लाटण्यासाठी सध्या चढाओढीच जास्त दिसून येत आहेत. १९४८ साली वादळाने तडाखा बसलेल्यांनादेखील गावागावांतून मंडळींनी एकत्र येऊन अन्नदानाचे भरीव कार्य केले होते, याचे स्मरण होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा