‘आशाकिरण’ हा रेणू दांडेकर यांचा लेख वाचला. आधुनिक भारतात शिक्षणाचे जे बाजारीकरण होत चालले आहे. (होत नसते ते आपण करत असतो) त्या वर्मावर बोट त्या ठेवणार, अशी आशा या लेखात दिसते. शिक्षण हे साध्य आहे साधन नव्हे हे सर्वाना ज्ञात असून का सगळे जण इंग्रजी शाळेकडे जातात हे मला आत्तापर्यंत समजलेच नाही. बरं चांगले इंग्रजी बोलता येणे म्हणजे सुशिक्षित असणे हे आमच्या समाजाचे पूर्वग्रहदूषित आहे. यावर अनेक चर्चासत्रे झाली की मुलांना शिक्षण कसले द्यायचे मूल्याधारित शिक्षण की गडगंज पैसा कमावणारे शिक्षण. यामध्येच भारताची शिक्षण व्यवस्था फरफटत चालली आहे. यावर उपाय भरपूर आहेत, पण अंमलबजावणी कोण करणार हा कळीचा मुद्दा. यात पालकांची चूक असते असे नाही यापेक्षा शिक्षकाची, राजकारण्यांची, समाजाची महत्त्वाची भूमिका आहे. आज ग्रामीण भागात अनेक पालकांची शिक्षणाची बाराखडी न गिरवलेल्या पालकांना कसे कळणार की मुलांना मूल्याधारित शिक्षण द्यावं. ग्रामीण भागातील पालक हे अनुकरणप्रिय आहेत. एखाद्या गावातील सुशिक्षित माणसाने आपल्या मुलाला कुठल्या शाळेत टाकलं ते पाहून त्याच इंग्रजी शाळेत टाकण्याचा अट्टहास करतात (यावरून हे दिसते की सुशिक्षितच अशिक्षितांसारखे वागतात.) आणि कोणी कष्ट करून, कोणी कर्ज काढून, कोणी जमिनी गहाण ठेवून त्या इंग्रजी शाळांना देतात. मला एवढेच म्हणायचे की समाजाच्या वृत्तीमध्ये बदल करण्यासाठी शासनाने, शिक्षकाने, तुमच्यासारख्या सुशिक्षित नागरिकाने गावोगल्ली, वाडय़ावस्तीवर जाऊन पालकांचे समुपदेशन करावे की जीवन जगण्यासाठी मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास महत्त्वाचा आहे. इंग्रजी शाळेमध्ये फक्त तिथेच मिळते असे नाही. एक चांगली व्यक्ती घडविण्यासाठी, एक सुजाण नागरिक घडण्यासाठी सर्व जण मिळून प्रयत्न करू, असे समुपदेशन करावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा