गदिमांचे शब्द आहेत –
‘ही एक धर्मशाळा
सारे इथे प्रवासी
दिनरात दोन दारे
येण्यास जावयासी’
आपल्या श्वासाचेदेखील असेच आहे. क्षणभर विचार करा. आपण अन्नसेवन करण्यासाठी एकच तोंड वापरतो. पण श्वासाचे सेवन करण्यासाठी मात्र दोन दारे आहेत. वास्तविक दोन्ही नाकपुडय़ांतून घेतलेली हवा घशात, श्वासनलिकेत नंतर एकत्रच होणार आहे, मग ‘दोन दारांचे’ प्रयोजन काय असावे? निर्मात्याने कोणतीही गोष्ट ‘उगीचच’, किंवा ‘दिखावा’ म्हणून निश्चितच निर्माण केलेली नाही. आधुनिक विज्ञानाने दोन्ही नाकपुडय़ांचा मेंदूच्या गोलार्धाशी असलेला संबंध सिद्ध केला आहे. उजवी नाकपुडी ‘घन’ दाब प्रभावित असते तर डावी नाकपुडी ‘ऋण’ दाब प्रभावित करत असते. उजव्या नाकपुडीला योग परिभाषेत ‘सूर्यनाडी’ म्हणतात तर डाव्या नाकपुडीला ‘चंद्रनाडी’ म्हणतात. सूर्यनाडी ऊर्जा प्रदान करते तर चंद्रनाडी शीतलता, शांतता प्रदान करते.
दिवसभरात अगदी पहाटेच्या वेळी आपल्या दोन्ही नाकपुडय़ा एका वेळी उघडय़ा असतात. त्या वेळी साधना खूप छान होते. एकाग्रता येते. दिवसभर एकाआड एक याप्रमाणे नाकपुडय़ांचे श्वसन चक्र चालू असते. त्यानुसार आपली कामे कशी पार पाडावी यांचे मार्गदर्शन करणारे ‘शिव स्वरोदय’ शास्त्र आपल्या ऋषीमुनींनी सांगितले आहे.
आज आपण सूर्याभ्यास शिकूया. उत्साहाची बॅटरी चार्ज करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
सूर्याभ्यास
सुखासनात बसा. पाठकणा समस्थितीत ठेवा. डोळे मिटून घ्या. डाव्या हाताच्या अंगठय़ाने डावी नाकपुडी अलगद बंद करा. डावा हात कोपरात सल ठेवा. आता उजव्या नाकपुडीने पाच आकडे म्हणत श्वास घ्या व मनातल्या मनात पाच आकडे म्हणत श्वास सोडून द्या.
आपण सूर्यनाडीने श्वास घेणे व सोडणे या क्रियेला सूर्याभ्यास म्हणतात. ही प्राणायामाची पूर्वतयारी आहे.
सूर्यनाडीने अनुकंपी मज्जासंस्था उद्दीपित होते. नाडीचे ठोके व रक्तदाब वाढतो. म्हणून कुठलीही कृती शक्यतोवर मार्गदर्शनाखालीच करणे अपेक्षित आहे.खा आनंदाने! : सिंड्रोम
वैदेही अमोघ नवाथे – आहारतज्ज्ञ – vaidehiamogh@gmail.com
प्रिय वाचकांनो, दिवाळीची पूर्वतयारी आतापर्यंत झालीच असेल. पूर्ण उत्साहाने दिवाळीचं स्वागत करायला आपण सज्ज झालो आहोतच. गेल्या आठवडय़ात दिवाळी -आहार- याविषयी आपण बोललो आहोत. आज बोलू या थोडं ‘सिंड्रोम’ विषयी.
दिवाळी झाली की माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते- वजन कमी करायचं किंवा मधुमेह आटोक्यात आणायचा आहे म्हणून! (दिवाळीच्या आधी आले तर चकली-लाडूवर ताव मारता येणार नाही ना!) पण जर आपलं आहार-विहार-निद्रा हे गणित बरोबर असेल तर आणि चार दिवस योग्य प्रमाणात फराळ केला तर काहीच बिघडत नाही.
आता ‘सिंड्रोम’ म्हणजे काय? तर अति-वजन आणि त्याबरोबरच मधुमेह, अति-रक्तदाब आणि रक्तातील वाढलेली कोलेस्टेरोलची पातळी असा एक समूह तयार झाला तर त्याला म्हणतात, ‘सिंड्रोम’ आणि खरं सांगायचं झालं तर हे चारही आजार होतात कारण आपलं त्रिसूत्रीचं गणित चुकतं आणि हे एका दिवसात किंवा चार दिवसांत होत नाही तर हळूहळू आजार होतो. उदा. आज अभ्यास केला नाही म्हणून परीक्षेत कमी मार्क नाही मिळत, तर नियमित अभ्यास केला नाही तर प्रश्न निर्माण होतो. तसंच काल आंबा खाल्ला म्हणून साखर वाढली असं नाही तर नेहमीचं आहाराचं संतुलन सांभाळलं नाही तर समस्या निर्माण होऊ शकते. रक्तवाहिन्या कडक होणं किंवा मधुमेहामुळे किडनी खराब होणं किंवा काल तेलकट खाल्लं म्हणून आज वजन वाढलं हा समजच चुकीचा आहे.
आज आपण थोड मधुमेहाविषयी बोलू या. आपण अन्नसेवन केल्यावर त्याचं रूपांतर शर्करेमध्ये होते जी आपल्या पेशींमध्ये गेल्यावर ऊर्जानिर्मितीचं काम करते. पण पेशींचा दरवाजा उघडण्यासाठी दरवान असतो ‘इन्सुलिन’ आणि जर तोच नसला किंवा असून योग्य काम नाही केलं तर रक्तातील साखरेची पातळी वाढत जाते आणि पेशी उपाशी राहतात- मग काय – वजन कमी होणे, अति तहान लागणे, अशक्तपणा येणे आणि रिपोर्ट्समध्ये वाढलेली साखरेची पातळी दिसणे! आपल्या हातात काय तर- वजन वाढू द्यायचं नाही, आपल्या वयाच्या आणि वजनाच्या प्रमाणे अन्न सेवन करायचं म्हणजे चया-पचय योग्य होईल, शारीरिक व्यायाम आणि चिंता-मुक्त आयुष्य- गणित खूप सोप्पय- जर सोडवलं तर!
मधुमेहींना उपयुक्त अन्नपदार्थ- कारलं, मेथी दाणे, दालचिनी, कडुिनब, जांभूळ बिया वगरे. अर्थात हे जादूई पदार्थ नाहीत. संतुलित आहारसुद्धा तेवढाच महत्त्वाचा. गेल्या महिन्यात माझ्याकडे एक रुग्ण आली होती जिची साखरेची पातळी खूप वाढली होती आणि वजनसुद्धा जास्त होतं. प्रमाणात आणि योग्य आहार, व्यायाम, शिळे आणि मदा- चरबीयुक्त पदार्थ पूर्ण बंद असे मी तिला सांगितले. त्याचा परिणाम म्हणजे, आज माझ्याकडे ती रुग्ण आली, ते पूर्ण नॉर्मल रिपोर्ट घेऊन आणि ५ किलो वजन घटवून. तिला जादूच वाटली, पण फक्त आपल्या तब्येतीची ‘नस’ पकडता आली आणि पचन/ चया-पचय सुधारलं की आरोग्य दूर पळत नाही. त्याचा नक्कीच फायदा होतो.
हिरवंगार सूप :
साहित्य : हिरव्या मटारची सालं : २ कप, हिरवा मटार : २ मोठे चमचे , बारीक कापलेला पालक : २ मोठे चमचे , बारीक चिरलेली कोथिंबिर : २ मोठे चमचे, बदाम : ४, नारळाचे दूध : २ मोठे चमचे , आलं : १ मोठा चमचा, काळीमिरी पावडर : १ चमचा, लाल मिरची बिया : १ मोठा चमचा मीठ चवीनुसार.
पद्धत :
हिरवे मटार , हिरव्या मटारची सालं, बदाम उकडवून घ्या.
बारीक करून गाळा .
त्यामध्ये नारळाचे दूध आणि उरलेले साहित्य घाला, त्याला गरम करा.
गरम गरम सूप प्यायला द्या.
लहानपणापासून मी पाडव्याला कडुनिंब पानं खाल्ली आहेत. त्या वेळी ‘न खाऊन सांगणार कोणाला?’ किंवा पप्पांनी सांगितलं म्हणून मी खात होते. पण त्याच ‘कडू’ चवीने आरोग्यदायी नवीन वर्षांचे ‘गोड’ स्वागत करू या. दिवाळी- पाडवा आणि नव-वर्षांच्या मनोमन शुभकामना!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा