करोना हे मोठं आव्हान असून आपण त्याचा सामना करत आहोत. मात्र आपण यावेळी मानवतेसमोर असणाऱ्या इतर आव्हानांकडे आपण दुर्लक्ष करुन चालणार नाही. हवामानात होणारे बदल, बदलती जीवनशैली पुढील पिढीसाठी धोकादायक आहे. हवामान पद्धतीत बदल होत असून धृवांवरील बर्फ वितळत आहे, नद्या, जंगलं संकटात आहेत. गौतम बुद्धांनी आपल्याला निसर्गाचा आदर करण्याची शिकवण दिली आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. मला अभिमान वाटतो की भारत काही अर्थव्यवस्थांपैकी एक आहे जी शाश्वत विकासाच्या मार्गावर चालत आहे असंही ते म्हणाले आहेत.

वैशाख बौद्ध पोर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी हवामान पद्दतीत बदल होत असून नद्या, जंगलं संकटात असल्याचा उल्लेख करत निसर्गाचा आदर करणं ही बुद्ध यांनी दिलेली शिकवणं महत्वाची असल्याचं सांगितलं. करोनामुळे संपूर्ण देश संकटात असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका यांचे आभार मानले आहेत. तसंच करोनामुळे मृत्यू झालेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे.

Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती
Police dressed as priests in Uttar Pradesh
अन्वयार्थ : पोलीस पुजारी.. की पुजारी पोलीस!
FIR registered, Dhirendra Shastri Bageshwar Baba, mohadi police station, bhandara district, controversial statement
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबांना आक्षेपार्ह विधान भोवले, गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण….
1 to 7 April 2024 Weekly Horoscope
७ एप्रिलपर्यंत लक्ष्मी नारायणासह ३ राजयोग बनल्याने कर्क- कन्यासह ‘या’ राशी जगतील अच्छे दिन, १२ राशींचे भविष्य वाचा

पुढे ते म्हणाले की, “गौतम बुद्ध यांचं जीवन शांतता, एकता आणि सुसंवाद यांच्याशी जोडलेलं होतं. पण आजही आपल्यातील काही घटक समाजात तिरस्कार, दहशत आणि हिंसा परसरवत आहेत. मानवतेवर विश्वास असणाऱ्या सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून त्यासाठी गौतम बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं गरजेचं आहे”.

“करोनाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. करोनानंतरचं जग आत्तासारखं अजिबात नसेल. आगामी काळात करोनाआधी आणि करोनानंतर अशीच चर्चा असेल. पण गेल्या वर्षभरात अनेक महत्वाचे बदलही घडले आहेत. आता आपल्याला करोनाची चांगली ओळख झाली असून त्याच्याविरोधाच लढण्याचं धोरण आखू शकतो. तसंच आपल्याकडे लस असून जीव वाचवण्यासाठी आणि करोनाचा पराभव करण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. करोना आल्यानंतर वर्षभरात लस येणं हा मानवी दृढनिश्चय दाखवतं. भारताला आपल्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे, ज्यांनी लसनिर्मितीसाठी काम केलं,” अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी कौतुक केलं आहे.

नरेंद्र मोदींनी यावेळी पुन्हा एकदा पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, स्वयंसेवक यांचा उल्लेख करत सलाम केला. मोदींनी यावेळी बुद्धाने आपल्याला जीवनशैली आणि निसर्गाचा आदर करण्याची शिकवण दिली असल्याचं म्हटलं आहे.