खार्तुम : सुदानमधील अंतर्गत संघर्षांमुळे आतापर्यंत १ लाख स्थानिकांनी देशाबाहेर स्थलांतर केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याशिवाय देशांतर्गत पातळीवर ३ लाख ३० हजारांपेक्षा जास्त नागिरकांनी आपापले घरदार सोडून दुसरीकडे आश्रय घेतला आहे. सुदानमधील हिंसाचारात आतापर्यंत किमान ४३६ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि बाराशेपेक्षा जास्त जखमी झाले आहेत.

सुदानची सत्ता ताब्यात राखण्यासाठी जनरल अब्देल फताह अल-बुऱ्हान यांच्या नेतृत्वातील सैन्य (एसएएफ) आणि जनरल मोहम्मद हमदान दगालो यांच्या नेतृत्वाखालील निमलष्करी दल (आरएसएफ) या दोन गटांमध्ये १५ एप्रिलपासून हिंसक संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांनी शस्त्रविराम मान्य केला असला तरीही हिंसा थांबलेली नाही. राजधानी खार्तुम आणि इतर शहरांमध्ये बंदुकांचे आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत असून त्यामुळे मदतकार्यात अडथळे येत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या मदतकार्य अधिकाऱ्यांनी सांगितले. खार्तुमचा बराचसा भाग निर्मनुष्य झाला आहे.

IT Company, IT , IT Company Jobs,
‘आयटी’तील बेरोजगारांचे लोंढे अन् त्यामागील अमानवीय चेहरा…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Buldhana, illegal biodiesel, Mumbai squad ,
बुलढाणा : ७१ लाखांचे अवैध बायोडिझेल टँकरसह जप्त! मुंबईच्या पथकाची ‘हाय-वे’वर कारवाई
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली
Explosion at an ordnance manufacturing factory in Jawahar Nagar
भंडाऱ्यातील घटनेमुळे देशभरातील आयुध निर्माणीतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे का?
Increase in ST fares after elections are over is fraud with poor people Vijay Vadettiwar criticizes
निवडणूक होताच एसटीची दरवाढ, ही गरीब जनतेची लूट; विजय वडेट्टीवार यांची टीका
Maharashtra tiger deaths
विश्लेषण : वर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच ११ वाघांचा मृत्यू… महाराष्ट्रात व्याघ्रसंरक्षणाचे गांभीर्य हरवले आहे का?
Preparations In Full Swing For 58th Nirankari Sant Samagam
पिंपरीत आजपासून निरंकारी संत समागम; देश, विदेशातील भक्त दाखल

या हिंसाचाराचा सर्वाधिक फटका गरिबांना बसला आहे. सुदानमधील जवळपास दोनतृतीयांश नागरिक आधीपासूनच बाह्य मदतीवर अवलंबून आहेत. गेल्या दोन आठवडय़ांपासून सुरू असलेल्या हिंसेमुळे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यात अडथळे येत आहेत. सुदानमधून होणाऱ्या स्थलांतरामुळे शेजारील देशांवरही ताण येत असून यातून प्रादेशिक संकट निर्माण होणार असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वाधिक स्थलांतर इजिप्तमध्ये झाले असून ४० हजारांपेक्षा जास्त नागरिक तिकडे गेले आहेत.

Story img Loader