भारत- म्यानमारच्या सीमाभागासह ईशान्येकडील काही राज्यांचा परिसर मंगळवारी सकाळी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप ५.५ रिश्टर स्केल इतक्या क्षमतेचा होता. याशिवाय, आसाममधील कार्बी आंगलोंग या भागातही पहाटे साडेपाच वाचता ३.१ रिश्टर स्केल इतक्या क्षमतेचे भूंकपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे अद्याप कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचा धक्का जाणविण्यास सुरवात झाल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर मोकळ्या जागेत आश्रय घेतला. म्यानमारमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोलकाता, गुवाहाटी, पाटणा, भुवनेश्वर आणि दिल्लीच्या भागांमध्येही या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 23-08-2016 at 09:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 5 magnitude earthquake strikes india myanmar border region tremors felt in assam