पीटीआय, नवी दिल्ली

मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समाजांबरोबर लवकरच चर्चा करेल व त्यांच्यातील वांशिक दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. मणिपूरमधील सुरक्षेच्या मुद्द्यावर सोमवारी येथे झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.

national human rights commission orders police inquiry into detaining rti activist
माहिती अधिकार कार्यकर्त्याला केले नजरकैद; पोलिसांच्या चौकशीचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आदेश
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
Champai Soren,
Champai Soren : “मुख्यमंत्री म्हणून माझे कार्यक्रम रद्द करण्यात आले, मला पदावरून हटवण्यात आलं, अन् माझा…”; नाराजीच्या चर्चांवर चंपई सोरेन यांची पोस्ट!
BJP, Chitra Wagh, criminal public interest litigation, Chief Minister, Eknath Shinde, Sanjay Rathod Pune, TikTok, young woman's death, defamation,
मदत नको, पण कुटुंबीयांची बदनामी थांबवा, संजय राठोड प्रकरणात मृत तरुणीच्या वडिलांची न्यायालयात मागणी
Malegaon, Deputy Chief Minister Ajit Pawar, NCP, Ajit Pawar met Aasif Shaikh, Jan samman Yatra, Asif Shaikh, Sharad Pawar group, Congress, Sheikh family, defections, conciliatory relationship, BJP alliance, Malegaon Central Constituency, independent elections, Maha vikas Aghadi
अजित पवार यांच्याकडून मालेगावात अल्पसंख्यांकांना आपलेसे करण्याची खेळी
Ladki Bahin Yojana Aditi Tatkare
“…तर १५०० परत घेऊ”, रवी राणांच्या विधानावर आदिती तटकरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “महायुतीच्या सरकारने…”
Parambir Singh and Eknath Shinde
Eknath Shinde : “मविआच्या काळात एकनाथ शिंदेंनाही अडकवण्याचा प्रयत्न झाला”, परमबीर सिंग यांच्या दाव्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी त्यांच्या मंत्रिमंडळातील…”

वर्षभरापेक्षा अधिक काळ मणिपूरमध्ये दोन समाजांमध्ये प्रचंड हिंसाचार होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल अनुसूया उइके यांनी शहा यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह, पोलीस महासंचालक राजीव सिंह, राज्याचे मुख्य सचिव विनित जोशी यांच्याबरोबर शहा यांनी बैठक घेतली. बैठकीनंतर मोदी सरकार मणिपूरमध्ये दीर्घकालीन शांततेसाठी कटिबद्ध असल्याचे शहा यांनी सांगितले. गरज पडल्यास धोरणात्मक पद्धतीने केंद्रीय पथके मणिपूरमध्ये तैनात करण्यात येतील, असे संकेतही त्यांनी दिले.

हेही वाचा >>>‘मतपेढीच्या राजकारणाचा तुष्टीकरणाशी संबंध’; एनसीईआरटीच्या ११वी राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकातील प्रकरणांत बदलांमुळे वाद

मुख्यमंत्री अनुपस्थित

या महत्त्वाच्या मुद्द्यावर सुमारे तासभर चाललेल्या बैठकीला केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, आयबीचे संचालक तपन डेका, लष्करप्रमुख जन. मनोज पांडे, भावी लष्करप्रमुख लेफ्ट. जन. उपेंद्र द्विवेदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह मात्र बैठकीत हजर नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.