पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज सकाळी कू अॅपवर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली होती. “पंजाबच्या इतिहासात कुणी घेतला नसेल, असा निर्णय आज मी जाहीर करेन”, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं होतं. दुपारी ३ च्या सुमारास भगवंत मान यांनी त्यासंदर्भात मोठी घोषणा केली. याच घोषणेच्या संदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये पंजाबच्या जनतेला अजब आवाहन केलं आहे. पंजाब सरकारने केलेल्या या घोषणेची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

भगवंत मान यांनी जाहीर केल्यानुसार दुपारी ३ च्या सुमारास त्यांनी पंजाबमध्ये अँटि करप्शन हेल्पलाईनची घोषणा केली. २३ मार्चपासून पंजाबमध्ये अँटि करप्शन हेल्पलाईन सुरू होणार असून राज्यातल्या लोकांना त्या क्रमांकावर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देखील तक्रार नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. पंजाबमधून भ्रष्टाचार हद्दपार करण्याची घोषणा आपनं निवडणुकांच्या आधी केली होती. त्यानुसार या हेल्पलाईनची घोषणा करण्यात आली आहे.

rahul gandhi Arvind Kejriwal Sattakaran
राहुल गांधींच्या रडारवर केजरीवालच का? काँग्रेसचं राजधानीत पुनरागमनासाठीचं धोरण काय?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
PM Narendra Modi
“मोदी व न्यायाधीशांना मारण्यासाठी पाण्यात विष…”, पंतप्रधानांचा केजरीवालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पलटवार
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”

अरविंद केजरीवाल यांचं आवाहन!

दरम्यान, भगवंत मान यांनी केलेल्या घोषणेवर अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या नागरिकांना भ्रष्टाचाऱ्यांविरोधात तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे. “जर कधी तुमच्याकडे कुणी लाच मागितली, तर त्याला नकार देऊ नका. त्याऐवजी तुमचं संभाषण रेकॉर्ड करा आणि ती ऑडिओ किंवा व्हिडीओ क्लिप व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवा. आम्ही तुम्हाला खात्री देतो, की अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल”, असं अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं आहे.

“जेव्हा मी दिल्लीत पहिल्यांदा सरकार स्थापन केलं होतं, तेव्हा देखील मी अशाच प्रकारे व्हॉट्सअॅप नंबर जाहीर केला होता. त्या ४९ दिवसांमध्ये आम्ही जवळपास ३० ते ३२ अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करून त्यांना तुरुंगात पाठवलं होतं”, असं केजरीवाल म्हणाले.

Video : “ये राजनीती क्या होती है?” विजयानंतर भगवंत मान यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, सिद्धू होते शोमध्ये जज!

“दिल्लीतून भ्रष्टाचार हद्दपार झाला आणि तो फोन नंबर सामान्यांच्या हातातलं सर्वात मोठं शस्त्र ठरला”, असं देखील केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं.

Story img Loader