मोदी सरकारने तुरुंगांच्या व्यवस्थापनासाठी देण्यात येणाऱ्या निधीत तरी वाढ करावी, कारण येणाऱ्या काळात सत्ताधाऱ्यांनाही तुरुगांत जावं लागेल, अशी खोचक टीका आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केली आहे. राज्यसभेत अर्थसंकल्पावर बोलताना त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.

नेमंक काय म्हणाले संजय सिंह?

“यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने शिक्षण, संरक्षण, कृषी, आरोग्य अशा महत्त्वाच्या क्षेत्राचा निधी कमी केला आहे. इतकच नाही तर, मोदी सरकारने या अर्थसंकल्पात तुरुंगांच्या व्यवस्थापनासाठी देण्यात येणाऱ्या निधीतही घट केली आहे. मोदी सरकारने किमान या निधीत तरी वाढ करावी, कारण आगामी काळात विरोधकांनाही तुरुंगात जायचं आहे”, अशी खोचच टीका संजय सिंह यांनी केली.

national human rights commission orders police inquiry into detaining rti activist
माहिती अधिकार कार्यकर्त्याला केले नजरकैद; पोलिसांच्या चौकशीचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आदेश
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
women s safety top national priority pm modi at lakhpati didi sammelan
महिला सुरक्षेला प्राधान्य; जळगावमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, अत्याचार रोखण्यासाठी केंद्राकडून सहकार्याची ग्वाही
Balasaheb Shivarkar demanded that the ladaki bahin scheme should be implemented for all
‘लाडकी बहीण’ बाबत माजी राज्यमंत्र्यांची मोठी मागणी म्हणाले…!
vijay wadettivar
Vijay Wadettivar : “सरकारी तिजोरीतून महिलांना पैसे देऊन स्वत:ची पाठ थोपटणारे आता…”; बदलापूर प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचं शिंदे सरकारवर टीकास्र!
Karnataka Chief Minister Siddaramaiah addresses the Legislative Party meeting
कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांकडून गुरुवारी विधिमंडळ पक्ष बैठक; राज्यपालांच्या भूमिकेने वाद
Aditya Thackeray criticized the Shinde government
शिंदे सरकार अदानींच्या खिशात; आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका
Opposition leader Vijay Wadettiwar criticized the state government
‘सरकारी तिजोरीची अक्षरशः उधळपट्टी; टेंडर काढणे व कमिशन खाणे…’ विजय वडेट्टीवार यांची टीका

हेही वाचा – “मंत्रीजी खिशात हात टाकून पुन्हा सभागृहात येऊ नका”, लोकसभा अध्यक्षांचा संताप; महाराष्ट्राच्या खासदारालाही सुनावलं

“स्वत:ची खूर्ची वाचवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न”

“निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला भाजपाचे लोक क्रांतिकारी म्हणत आहेत. हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंकल्प आहे, असं सांगितलं जात आहे. मात्र, वास्तविकता ही आहे, की मोदी सरकारने या अर्थसंकल्पात शिक्षण, संरक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रासाठीच्या निधीत घट केली आहे, मुळात मोदी सरकारने केवळ स्वत:ची खूर्ची वाचवण्यासाठी दोन राज्यांना भरघोस मदत दिला आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

“विरोधकांवर दबाव आणण्यासाठी ईडी-सीबीआय वापर”

पुढे बोलताना संजय सिंह यांनी मोदी सरकार विरोधकांवर दबाव आणण्यासाठी ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर करत असल्याचाही आरोप केला. “मोदी सरकारने खोट्या आरोपाखाली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शिक्षमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक केली आहे. याशिवाय पश्चिम बंगालच्या तीन मंत्र्यांनाही तुरुंगात टाकण्यात आलं आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांवरही अशाप्रकारे कारवाई करण्यात आली आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Kanwar Yatra Update: “नाव सांगण्याचा कुणावर दबाव टाकता येणार नाही”, सुप्रीम कोर्टानं यूपी सरकारला सुनावलं!

संजय सिंह यांच्या टीकेवर राज्यसभेचे सभापती म्हणाले…

दरम्यान, संजय सिंह यांनी तुरूंगाच्या निधीबाबात केलेल्या टीकेवर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनीही भाष्य केलं. “संजय सिंह यांनी अतिशय महत्त्वाच्या आणि मार्मिक विषयांवर टीप्पणी केली आहे. याला एक विशेष पार्श्वभूमीसुद्धा आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यांनी याची दखल घ्यावी”, असे ते म्हणाले. यावर बोलताना भाजपाचे नेते जे.पी. नड्डा यांनी संजय सिंह यांच्या सुचनेची दखल घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली.