काँग्रेसने हकालपट्टी केलेले नेते आचार्य प्रमोद कृष्णम हे सातत्याने काँग्रेसवर, काँग्रेसच्या विचारसरणीवर, धोरणांवर आणि राहुल गांधींसह पक्षातील नेत्यांवर टीका करत आहेत. दरम्यान, प्रमोद कृष्णम यांनी आता राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत. प्रमोद कृष्णम म्हणाले, काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली तर ते राम मंदिराबाबतचा निर्णय बदलतील. राम मंदिराबाबतच्या खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तेव्हा राहुल गांधी आणि त्यांच्या जवळच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्या बैठकीत ठरलं की काँग्रेसचं सरकार आलं तर आपण एका शक्तीशाली आयोगाची स्थापना गठित करू. राजीव गांधी यांनी शाह बानो प्रकरणाचा निकाल ज्या पद्धतीने बदलला होता, त्याप्रमाणे राम मंदिराबाबतचा निर्णय बदलून टाकू. मी ३२ वर्षांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये होतो. त्यामुळे मी त्यांच्या चाली ओळखतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा