पीटीआय, नवी दिल्ली

पंजाब आणि हरियाणामध्ये शेतांमध्ये पिकांची कापणी झाल्यानंतर उरलेले खुंट जाळण्याची पद्धत ही गंभीर समस्या असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा तयार करा असे निर्देश ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने (एनजीटी) अलिकडेच दोन्ही राज्यांना दिले. हा आराखडा पुढील वर्षांसाठी १ जानेवारी ते १ सप्टेंबर या कालावधीमध्ये पिकांचे खुंट जाळण्यासंबंधी ठराविक मुदतीसाठी असेल. यावर उपचारात्मक कृती आतापासूनच सुरू केली पाहिजे.

Food and Drug Administration seized 285 liters of adulterated milk in Mumbai news
मुंबईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त; अन्न व औषध प्रशासनाची मालाडमध्ये कारवाई
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Agitation of farmers affected by canal leakage to stop circulation of Nilwande Dam
निळवंडे धरणाचे आवर्तन बंद पाडण्यासाठी कालव्याच्या गळतीमुळे त्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन
Golden Jackal
Golden Jackal : विक्रोळीत लांडग्यांची दहशत? वनअधिकारी म्हणतात, “तो लांडगा नव्हे तर…”
construction houses mangroves, state government,
खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश
Mumbai, Sanjay Gandhi National Park, slum rehabilitation, High Court order, illegal encroachments, forest management, state government,
राष्ट्रीय उद्यान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश, बेकायदा झोपडीधारकांच्या तातडीच्या पुनर्वसनासाठी धोरण आखण्याबाबत सूचना
order of CIDCO Deputy Registrar to submit Building Hazardous Certificate navi Mumbai
पुनर्विकासातील घोळांना चाप; इमारत धोकादायक प्रमाणपत्र सादर करण्याचे उपनिबंधकांचे आदेश
Badalapur Crime News
Badlapur Crime : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार, लोकांचा प्रचंड उद्रेक, आत्तापर्यंत काय काय घडलं?

पंजाबमधील शेतांमध्ये खुंट जाळण्याच्या प्रकारांमुळे हवेच्या प्रदूषणात वाढ होत असल्याच्या वृत्तपत्रातील बातमीची दखल घेऊन ‘एनजीटी’ने या प्रकरणाची सुनावणी घेतली. लवादाचे अध्यक्ष न्या. प्रकाश श्रीवास्तव म्हणाले, की हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या (सीएक्यूएम) अहवालानुसार या वर्षी पंजाबमध्ये शेतामध्ये खुंट जाळण्याच्या ३६ हजार ६३२ घटना घडल्या. त्यापैकी दोन हजार २८५ प्रकार १५ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत घडले. न्या. अरुण कुमार त्यागी आणि तज्ज्ञ ए सेंथिल वेल हे ‘एनजीटी’चे अन्य दोन सदस्य आहेत.

हेही वाचा >>>भारतीय विद्यार्थ्याला अमेरिकेत सात महिने डांबून ठेवलं, मार-मार मारलं अन्…, पोलिसांनी दिली अमानवीय कृत्यांची माहिती

जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, १५ सप्टेंबर ते १६ नोव्हेंबरदरम्यान पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे पाच हजार ३५२ प्रसंग घडले तर हरियाणाच्या फरिदाबादमध्ये ४७६ आगी लावण्यात आल्या. खुंट जाळल्यामुळे गंभीर समस्या उद्भवतात हे लक्षात घेऊन आतापासूनच उपाययोजना केली पाहिजे असे ‘एनजीटी’ने सांगितले.

पंजाब आणि हरियाणासह, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात शेतांमध्ये खुंट जाळले जातात. त्यामुळे राजधानी दिल्ली शहरामधील प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढते. एका अभ्यासानुसार, ही पद्धत दिल्लीच्या प्रदूषणात ३० टक्क्यापेक्षा जास्त भर घालते. गेल्या महिन्यामध्ये दिल्लीच्या हवेची गुणवत्ता घातक ते अतिघातक अशी राहिली आहे.