केंद्र सरकारने एअर इंडियाच्या खासगीकरणाला तत्त्वतः मान्यता दिल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. मोदी सरकारने भांडवलदारांना खूश करण्यासाठीच हा निर्णय घेतल्याची टीका काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केली. ते गुरूवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली. निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. अदानी यांच्यासारख्या भांडवलदारांना शेतकऱ्यांच्या एकूण रकमेपेक्षा मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर केले जाते. यावरून हे स्पष्ट होते की, एअर इंडियाच्या खासगीकरणाचा निर्णय हा भांडवलदारांच्या खुशामतीसाठी घेण्यात आला आहे. यामागील सरकारचा हेतू स्पष्ट आहे. यामध्ये देशाचे हित नव्हे तर निवडणुकांचे राजकारण असल्याचा आरोप अय्यर यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा