भारताने कॅनडात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कॅनडात भारतविरोधी कारवायांमध्ये तीव्र वाढ झाली असून द्वेष पसरवला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कॅनडातील द्वेषपूर्ण गुन्हे, सांप्रदायिक हिंसाचार आणि भारतविरोधी कारवायांवर परराष्ट्र मंत्रालयाची करडी नजर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅनडा : गोळीबारात जखमी झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

अशाप्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करुन गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती परराष्ट्र मंत्रालयाकडून कॅनडा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. “कॅनडामध्ये राहत असलेले भारतीय नागरिक आणि विद्यार्थी यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. जे लोक प्रवासासाठी अथवा शिक्षणासाठी कॅनडामध्ये जायच्या तयारीत आहेत, त्यांनी योग्य खबरदारी घेत सतर्कता बाळगावी,” असे निवेदन परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केले आहे.

भारत UNSC चा सदस्य नसण्याचं कारण काय? युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची बैठकीत विचारणा

कॅनडातील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी ओटावातील भारतीय मोहिमेत अथवा टोरंटो आणि वॅनक्युवरमधील वाणिज्य दुतावासात नोंदणी करावी, असे आवाहन भारत सरकारकडून करण्यात आले आहे. यामुळे आणीबाणीच्या काळात भारतीय उच्चायुक्त किंवा दुतावासाला भारतीय नागरिकांशी संपर्क साधणे सोयीस्कर होईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

कॅनडात भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले वाढले आहेत. मंगळवारी ऑन्टारियोमध्ये झालेल्या गोळीबाळात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सतिवदर सिंग असे या घटनेत मृत झालेल्या २८ वर्षीय तरुणाचे नाव आहे. सतिवदर भारतातून कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेला होता. ‘एम. के. ऑटो रिपेअर्स’ या दुकानात तो अर्धवेळ नोकरी करत होता. सतिवदरच्या मृत्यूनंतर कॅनडातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti india activities in canada foreign ministry of india asked indians to stay cautions rvs