Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) हे सध्या प्रचंड आक्रमक झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या तर इंडिया आघाडीने २२५+ जागांवर मजल मारली. ज्यानंतर राहुल गांधी यांचं एक वेगळंच रुप देशाला पाहण्यास मिळतं आहे. पहिल्याच भाषणात त्यांनी भगवान शंकराचा फोटो दाखवला आणि आमच्याबरोबर भगवान शंकर कसे आहेत हे सांगत नरेंद्र मोदी आणि अमित शाह तसंच भाजपावर जोरदार टीका केली. त्यानंतर नुकतंच त्यांनी लोकसभेत भाषण केलं ज्यात त्यांनी महाभारतातल्या अभिमन्यूचा संदर्भ दिला आणि चक्रव्यूह कसा रचला जातो आहे ते सांगितलं. या सगळ्यानंतर राहुल गांधींनी ( Rahul Gandhi ) केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केलेल्या भाषणात राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी शेतकरी, युवा, महिला, कामगार, लघु-उद्याोजक, दलित-आदिवासी, ओबीसींची तुलना अभिमन्यूशी केली. सहा जणांनी अभिमन्यूची हत्या केली. आताच्या आधुनिक चक्रव्यूहात आधुनिक अभिमन्यूंना अडकवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उद्याोगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदाणी या सहा जणांनी हा आधुनिक चक्रव्यूह रचल्याचा आरोप गांधी यांनी केला. या लोकसभेतच ‘इंडिया’ आघाडी हमीभावाचा कायदा आणि जातगणना संमत करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच मध्यमवर्गही भाजपपासून दूर जात असल्याचा दावा गांधी ( Rahul Gandhi ) यांनी केला.

emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
giriraj Singh Rahul gandhi
“देशद्रोह्यांना आरएसएसची विचारधारा कधीच समजणार नाही”, राहुल गांधींच्या टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर!
Suicide in uttarpradesh
Man Suicide in UP : “आयुष्यात हवं ते करा पण लग्न करू नका” म्हणत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!
BKC, Mumbai police, case aginst Congress workers, protest, PM Narendra Modi, Mumbai, Varsha Gaikwad, black flags, pm narendra modi bkc visit, Mumbai news,
बीकेसी आंदोलनप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा
rahul gandhi jiu jitsu aikido
राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ‘जिउ-जित्सू’ आणि ‘आयकिडो’ यांचा केला होता सराव, ते काय आहे?
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
Pune potholes, Pune Municipal Commissioner,
पुणे : खबरदार… खड्डे न बुजविणाऱ्या मंडळांना आयुक्तांचा इशारा
Rahul Gandhi criticism against the government in the Lok Sabha
सरकारचा ‘चक्रव्यूह’ भेदणार! राहुल गांधींचा लोकसभेत घणाघात; हमीभाव, जातगणनेचे आश्वासन

हे पण वाचा- Rahul Gandhi in Wayanad : “वडिलांना गमावल्यानंतर जे दुःख झालं, तेच दुःख आज होतंय”, वायनाडची परिस्थिती पाहून राहुल गांधी व्यथित

आता राहुल गांधी यांनी काय पोस्ट केली आहे?

“दोघांपैकी एकाला माझं चक्रव्यूह संदर्भ देऊन केलेलं भाषण आवडलं नाही. ईडीतल्या आतल्या गटाने मला सांगितलं की तुमच्यावर आता छापेमारी केली जाणार आहे. त्यासंदर्भात योजना तयार केली जात आहे. मी तयार आहे, ईडीची वाट पाहतो आहे. चहा आणि बिस्किटं माझ्याकडून.” अशी सूचक पोस्ट राहुल गांधींनी केली आहे.

सध्याचा चक्रव्यूह कमळाच्या आकाराचं आहे-राहुल गांधी

२९ जुलै रोजी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलत असताना राहुल गांधींनी ( Rahul Gandhi ) चक्रव्युहाचा संदर्भ दिला होता. एवढंच नाही तर सध्याचं चक्रव्यूह हे कमळाच्या आकाराचं आहे, ते चक्रव्यूहही त्याच आकाराचं होतं. आजच्या चक्रव्यूहात सहा लोक आहेत. त्यावेळी सहा लोक होते. तसेच आजही आहे. त्यात मोदी, शाह, संघ प्रमुख मोहन भागवत, डोवाल, अदानी आणि अंबानी आहेत. हे सर्व काही कंट्रोल करत आहेत. असं राहुल गांधी म्हणाले होते. आता राहुल गांधींनी त्यांच्यावर ईडीची छापेमारी होणार आहे अशी पोस्ट केली आहे.