देशाच्या संरक्षण सज्जतेत अभाव असल्याबद्दल भाजपचे नेते अरुण जेटली यांनी चिंता व्यक्त केली आहे. संरक्षणमंत्री ए. के. अॅण्टनी यांची निर्णय घेण्याची असमर्थता मुख्यत्वे ही परिस्थिती उद्भवण्यास कारणीभूत आहे, अशी टीकाही जेटली यांनी केली आहे.
आपल्या संरक्षणविषयक खरेदीलाही मोठय़ा प्रमाणावर फटका बसला आहे. अॅण्टनी यांनी निर्णय न घेतल्यानेच ही परिस्थिती ओढवली आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्यातील संबंध पुढे आले आहेत. त्यामुळे भारताने बेसावध न राहण्याची गरज आहे, असे जेटली यांनी म्हटले आहे.पाकिस्तानपेक्षा भारताचे लष्करी सामथ्र्य निश्चितच वरचढ आहे, मात्र सध्या ही दरी हळूहळू कमी होत चालली आहे. ज्या देशाची आंतरराष्ट्रीय सीमा १५ हजार कि.मी. आहे त्या देशाला केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून राहता येत नाही, असेही जेटली म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा