देशभरात सुरू असलेल्या पुरस्कार वापसीच्या चळवळीत सुप्रसिद्ध लेखिका अरूंधती रॉय सहभागी झाल्या आहेत. रॉय यांनी त्यांना १९८९ साली मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार सरकारला परत करताना गोमांसबंदी, अल्पसंख्याकांवरील हल्ले, विचारवंतांच्या हत्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील गदा आणि भाजप तसेच संघाच्या वाचाळवीरांनी केलेल्या वक्तव्यांविरोधात पुरस्कारवापसी करणाऱ्या लेखक, कलाकार आणि विचारवंतांनी सुरू केलेल्या चळवळीत सहभागी होणे अभिमानास्पद वाटत असल्याचे रॉय यांनी म्हटले. मात्र, आपली पुरस्कारवापसी ही असहिष्णुतेविरोधात नाही, कारण देशात जे घडतंय त्यासाठी अहिष्णुता हा शब्द फारच सौम्य असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. देशातील वैचारिक दुष्टचक्र आणि बुद्धिमत्तेवरील आघाताविरोधात हा लढा उभा राहिला आहे. त्यामुळे ही चळवळ अभूतपूर्व अशी म्हणावी लागेल, असे अरुंधती रॉय यांनी म्हटले.
अरुंधती रॉय यांना १९८९ मध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार त्यांनी परत केला आहे. १९९७ मध्ये ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीसाठी त्यांना बुकर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
संग्रहित लेख, दिनांक 5th Nov 2015 रोजी प्रकाशित
अरुधंती रॉय यांची पुरस्कार वापसी
पुरस्कार वापसीच्या चळवळीत सुप्रसिद्ध लेखिका अरूंधती रॉय सहभागी झाल्या आहेत
Written by रोहित धामणस्कर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 05-11-2015 at 11:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arundhati roy returns her national award