पीटीआय, नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी तिहार तुरुंगात शरणागती पत्करली. न्यायालयाने त्यांना लोकसभा निवडणूक प्रचारासाठी १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यापूर्वी केजरीवाल यांनी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले, तसेच राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

BJP challenges Ajit Pawar group MLA Sunil Shelke in Maval
मावळमध्ये अजितदादा गटाच्या आमदाराला भाजपचेच आव्हान
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Hassan Nasrallah Death :
Hassan Nasrallah Death : इस्रायलच्या हल्ल्यात हसन नसरल्लाह ठार झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये निदर्शने; मेहबुबा मुफ्तींनीही प्रचार सभा केल्या रद्द
Siddaramaiah
Siddaramaiah : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना MUDA प्रकरण भोवणार? राज्यपालांचा आदेश न्यायालयाने कायम ठेवल्याने सिद्धरामय्या अडचणीत
atishi takes charge as delhi cm with empty chair
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी बाजुला रिकामी खुर्ची ठेवून स्वीकरला पदभार; कारण सांगत म्हणाल्या…
Aam Aadmi Party Janata Ki Adalat at Jantar Mantar
केजरीवालांचे संघाला पाच प्रश्न; जंतरमंतरवर आम आदमी पक्षाची ‘जनता की अदालत’
Tirupati Laddu Controversy Pawan Kalyan
Tirupati Laddu Row: ‘माझी फसवणूक झाल्यासारखं वाटतं’, उपमुख्यमंत्री पवन कल्याण ११ दिवसांचा उपवास करणार
Delhi New CM Atishi
Delhi New CM Atishi : मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर आतिशी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, ” दिल्लीचे एकमेव मुख्यमंत्री…”

केजरीवाल यांनी रविवारी सकाळी ‘आप’चे नेते आणि कार्यकर्ते यांना पक्ष कार्यालयात संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, मी भ्रष्टाचारात सहभागी असल्यामुळे तुरुंगात परत जात नाही तर हुकूमशाहीविरोधात आवाज उठवल्यामुळे तुरुंगात जात आहे. ते पुढे म्हणाले की, ‘‘मला सर्वोच्च न्यायालयाने २१ दिवस दिले होते. हे २१ दिवस अविस्मरणीय होते. मी एकही मिनिट वाया घालवला नाही. मी देशाला वाचवण्यासाठी प्रचार केला. आम आदमी पक्ष महत्त्वाचा नाही, देश महत्त्वाचा आहे.’’ केजरीवाल १० मे रोजी तुरुंगातून बाहेर आले होते. त्यांच्यावर कथित दिल्ली मद्या घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>अरविंद केजरीवाल पुन्हा तिहारमध्ये; अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर शरणागती

भाजपच्या नेतृत्वाखाली रालोआ तिसऱ्यांदा सरकार स्थापन करत असल्याचा अंदाज व्यक्त करणाऱ्या मतदानोत्तर चाचण्या बनावट असल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला. हा दबावतंत्राचा भाग असल्याचे ते म्हणाले.

केजरीवाल तिहार तुरुंगात येण्यापूर्वी, तेथील वाहतूक मर्यादित करण्यात आली होती, तसेच सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. त्यांच्याबरोबर पत्नी सुनीता केजरीवाल आणि आपचे नेते होते. त्यामध्ये आतिशी, कैलाश गहलोत, सौरभ भारद्वाज, संजय सिंह इत्यादी नेत्यांचा समावेश होता.

भाजप निदर्शकाला अटक

केजरीवाल यांच्या राजघाट भेटीच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या अनेक भाजप कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यामध्ये दिल्लीचे पक्षप्रमुख वीरेंद्र सचदेव यांचाही समावेश होता. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काही निदर्शकांना तिथून हटवून कमला मार्केट पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर जवळपास १०० भाजप कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी दिली.

५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

दिल्ली न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम जामीन संपल्यानंतर तिहार तुरुंगात शरण झाल्यानंतर केजरीवाल यांना दूरदृष्ट प्रणालीद्वारे न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी हा आदेश दिला. तत्पूर्वी ईडीने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली होती.

मी राजघाटावर आदरांजली वाहिली. हुकूमशाहीचा अंत करण्यासाठी गांधीजी आपली प्रेरणा आहेत. मी हनुमान मंदिरात गेलो. मला बजरंगबलीचे आशीर्वाद आहे. ४ जूनला मंगळवार आहे. बजरंगबली हुकूमशाहीचा नाश करेल.अरविंद केजरीवालमुख्यमंत्री, दिल्ली