Asaduddin Owaisi on RSS chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संरसंघचालक मोहन भागवत हे त्यांच्या एका विधानामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. भागवत यांनी एका कार्यक्रमात बोलताना दोन किंवा तीन मुलांपेक्षा कमी मुले झाली तर समाजाचे अस्तित्व टिकणार नाही असे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा होत असून यावर एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औवेसींनी मोहन भागवातांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे.

अधुनिक लोकसंख्या शास्त्र असं सांगतं की लोकसंख्या वृद्धीदर २.१ पेक्षा कमी झाला की कोणतं संकट आलं नाही तर तो समाज नष्ट होतो. अनेक भाषा, समाज असे नष्ट झाले असल्याचे मोहन भागवत म्हणाले होते.

Shiva
Video: “तर ती माझ्या प्रेतावरून…”, आईचा विरोध पत्करून आशू शिवाला निवडणार; सर्वांसमोर देणार प्रेमाची कबुली, पाहा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…
Shiva
Video : “तुला काहीतरी सांगायचंय…”, शिवाचा विश्वास खरा ठरणार, आशू त्याचे प्रेम व्यक्त करणार; पाहा नेमकं काय घडणार
Muramba
Video: “ही रमाच आहे की…”, माहीच्या ‘त्या’ कृतीमुळे अक्षयला येणार संशय; ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट
Sanjay Mone
“आमचे मोने बाबा…”, मयुरी देशमुख ज्येष्ठ अभिनेते संजय मोनेंबाबत म्हणाली, “मोठ्या लोकांचा मोठेपणा…”
Avinash Narkar And Aishwarya Narkar why constantly do reel videos
अविनाश-ऐश्वर्या नारकरांचा सतत Reel व्हिडीओ करण्यामागे आहे ‘हा’ हेतू, अभिनेते म्हणाले, “ज्या वेळेला आम्हाला…”
Anjali Damania Demand
Anjali Damania : व्हायरल फुटेजनंतर अंजली दमानियांची मागणी, “राजेश पाटील यांना सहआरोपी केलं पाहिजे आणि…”

मोहन भागवत काय म्हणाले?

नागपूर येथील बी.आर.ए. मुंडले शाळेच्या सभागृहात रविवारी कठाळे कुलसंमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की, “जणसंख्या कमी होतेय हा चिंतेचा विषय आहे. कारण आधुनिक लोकसंख्या शास्त्र सांगतं, २.१ च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो. कोणी त्याला मारेल असं नाही, त्याला काही संकट नसलं तरी तो नष्ट होतो, पुढे चालत नाही. अनेक भाषा, समाज असे नष्ट झाले. त्यामुळे २.१ च्या खाली येता कामा नये. आपल्या देशाची जणसंख्या नीती जेव्हा ठरली, त्याच्यातही २.१ च्या खाली नसावे असे सांगण्यात आले. पण ०.१ तर माणूस जन्मत नाही, म्हणजे २ पेक्षा जास्त पाहिजे किंवा कमीत कमी ३ पाहिजे, असं शास्त्र सांगतं”, असे मोहन भागवत म्हणाले.

हेही वाचा>> “…अन्यथा आम्ही आमचं पुस्तक उघडू”, राऊतांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “भाजपा मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांऐवजी…”

असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रया

भागवतांच्या या विधानानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. औवेसी म्हणाले की, “हे त्यांनी नरेंद्र मोदींना शिकवायची गरज आहे. जे लोकसभा निवडणूकीत म्हणाले होते की मुस्लिम महिला जास्त मुले जन्माला घालतात. पंतप्रधान त्यांच्या भाषणात म्हणाले की, हिंदू महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून त्या महिलांना दिले जाईल ज्या जास्त मुले जन्माला घालतात. आता मोहन भागवत म्हणत आहेत की जास्त मुलं जन्माला घाला. आरएसएसवाल्यांनी लग्न करायला सुरूवात केली पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही आम्हाला शिव्या देता… झारखंडमध्ये म्हणाले की मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे”.

Story img Loader