लोकसभा निवडणुकांचं घोडामैदान जवळ आलं आहे. निवडणुका कधी होणार याची तारीख जाहीर झालेली नाही. मात्र राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशात AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी थेट राहुल गांधींना खुलं आव्हान दिलं आहे. लोकसभा निवडणूक लढण्याविषयी हे आव्हान देण्यात आलं आहे. ओवैसींच्या या वक्तव्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

काय म्हटलं आहे ओवैसी यांनी?

“मी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आव्हान देतो. वायनाड नाही हैदराबादमधून निवडणूक लढून दाखवा. मोठमोठ्या घोषणा देता, आरोप करता, मग आता माझं आव्हान आहे. मैदानात या आणि माझ्या विरोधात लढून दाखवला. काँग्रेसचे लोक काहीही म्हणू देत. मी तयार आहे.” असं म्हणत राहुल गांधी यांना ओवैसी यांनी आव्हानच दिलं आहे. हैदराबाद या ठिकाणी ओवैसींची सभा पार पडली. त्या सभेत ओवैसी यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच उत्तर प्रदेशात जो वादग्रस्त ढाँचा होता तो सगळ्यात जुन्या पक्षाच्या सत्तेच्या काळात उद्ध्वस्त करण्यात आला असाही आरोप ओवैसींनी केला.

Ranchi Police viral video
Ranchi Police : पोलीस ठाण्यातच दोन तरुणांकडून पोलिसांना मारहाण; व्हिडीओ व्हायरल, नेमकी कुठे घडला प्रकार?
Uttar Pradesh Kushinagar
Uttar Pradesh Kushinagar : मन सुन्न करणारी घटना! हॉस्पिटलचं ४ हजारांचं बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने वडिलांनी तीन वर्षांच्या मुलाला विकलं
bharat jodo yatra create unity in society rahul gandhi claim on 2nd anniversary
भारत जोडो यात्रेमुळे समाजात एकजूट; वर्धापन दिनानिमित्त राहुल यांचा दावा
report on climate change reveals power of mosquito increases four times more
हवामान बदलामुळे डासांची शक्ती चारपट वाढली; डेंग्यू, चिकनगुनिया वाढण्यामागचे कारण अभ्यासातून उघड
typhoon yagi hits vietnam close airport
चक्रीवादळामुळे व्हिएतनाममध्ये विमानतळे बंद करण्याचे आदेश
union hm amit shah assures jammu and kashmir statehood after assembly elections
निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा! केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे आश्वासन
nearly 62000 cases remain unresolved in various high courts over 30 years old
६२ हजार खटले ३० वर्षांपासून प्रलंबित; सर्व प्रकरणे उच्च न्यायालयांमधी
Lucknow building collapse,
Lucknow Building Collapse : उत्तर प्रदेशमध्ये तीन मजली इमारत कोसळली; पाच जणांचा मृत्यू, २४ जखमी; २८ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश
NRC application for adhar card
आसाममध्ये आधार कार्ड बनवण्यासाठी नवा नियम; मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांनी केली मोठी घोषणा; म्हणाले…

तेलंगणमध्ये विधानसभा निवडणूक पुढच्या वर्षी पार पडणार आहेत. तसंच लोकसभा निवडणूकही पुढच्याच वर्षी पार पडणार आहे. अशात एमआयएम आणि काँग्रेस आमनसामने आले आहेत. राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष असो की ओवैसींचा AIMIM पक्ष दोन्ही पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपा आणि एआयएमआयएम हे दोन पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत असा आरोप राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेत केला होता. त्यानंतर आता ओवैसींनी राहुल गांधींना ओपन चॅलेंज दिलं आहे.