नुकत्याच जाहीर झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालामध्ये भारत २०२३पर्यंत चीनलाही मागे टाकून जगभरातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनू शकतो. त्या पार्श्वभूमीवर देशाची लोकसंख्या आणि त्यामध्ये प्रत्येक धर्म, जातीच्या टक्केवारीची चर्चा होऊ लागली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात वक्तव्य करताना “लोकसंख्या नियंत्रण यशस्वीरीत्या साध्य करण्यासोबतच लोकसंख्येतील असंतुलन घडू देता कामा नये”, असं विधान केलं होतं. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

योगी आदित्यनाथ काय म्हणाले होते?

संयिक्त राष्ट्राच्या अहवालातील दाव्यावर बोलताना योगी आदित्यनाथ यांनी भारताच्या लोकसंख्येवर टिप्पणी केली होती. भारतात लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, हे खरंच आहे. पण त्याच वेळी लोकसंख्येत असमतोल देखील होता कामा नये, असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते. तसेच, एखाद्या समाजाची लोकसंख्या वाढत राहील आणि आपण इथल्या मूळ रहिवाशांचीच लोकसंख्या जनजागृती किंवा बळजबरीने स्थिर करू, असं देखील योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

spending public tax for Kumbh Mela
कुंभमेळ्याकरिता जनतेच्या कराचा व्यय कशासाठी?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Marriage Laws in India
विवाह-कायद्यांबाबत आजचा भारत बुरसटलेलाच…
Madras High Court judgment Maternity Leave Third Pregnancy
तिसर्‍या बाळंतपणाला मातृत्व रजा मिळेल का?
Hemangi Sakahi And Mamta Kulkarni
ममता कुलकर्णीच्या किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर पदावरून वाद; किन्नर महामंडलेश्वर हेमांगी सखी यांचे संतप्त सवाल
फडणवीस सरकारची जन्म दाखल्यांवर करडी नजर; बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मोहीम (फोटो सौजन्य पीटीआय)
‘Vote Jihad 2’: फडणवीस सरकारची बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मोहीम; आता जन्म दाखल्यांवर करडी नजर
c section deliveries rising in us
ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे भारतीय महिला वेळेपूर्वीच करताहेत सिझेरियन प्रसूती; नेमकं प्रकरण काय?
Increase in honorarium of women who provide information about illegal abortions say Prakash Abitkar
अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्या महिलांच्या मानधनात वाढ – आबिटकर

दरम्यान, याविषयी बोलताना असदुद्दीन ओवेसी यांनी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. “त्यांच्या स्वत:च्याच आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय की देशातील लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही कायद्याची गरज नाही. गर्भनिरोधकांचा सर्वाधिक वापर मुस्लीमच करतात. देशात एकूण जन्मदर हा २०१६मध्ये २.६ होता, तो आता २.३ टक्क्यांपर्यंत आला आहे. जागतिक पातळीवर देशातील लोकसंख्येचं प्रमाण सर्वोत्कृष्ट आहे”, असं ओवेसी म्हणाले आहेत.

“मुस्लीम इथले रहिवासी नाहीत का?”

दरम्यान, मुस्लीम इथले मूळ रहिवासी नाहीत का? असा सवाल ओवेसींनी योगी आदित्यनाथ यांना केला आहे. “मुस्लीम इथले रहिवासी नाहीत का? आपण जर वास्तव पाहिलं, तर भारतात मूळ रहिवासी हे फक्त आदिवासी आणि द्राविडी लोक आहेत”, असं ओवेसी म्हणाले.

“उत्तर प्रदेशमध्ये कोणत्याही कायद्याशिवाय ठरवलेला जन्मदर २०२६ ते २०३०पर्यंत साध्य करता येईल”, असं देखील ओवेसी यांनी नमूद केलं आहे.

Story img Loader