तुतिकोरीन जिल्ह्य़ात एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्याची तीन विद्यार्थ्यांनी हत्या केल्याच्या निषेधार्थ कन्याकुमारी जिल्ह्य़ातील सर्व महाविद्यालये २१ ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय प्राचार्याच्या संघटनेने घेतला आहे. महाविद्यालयात असभ्य वर्तन केल्याबद्दल इन्फण्ट जीजस महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश यांनी तीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकले होते. त्याचा राग मनात ठेवून या तीन विद्यार्थ्यांनी सुरेश यांची हत्या केली.