पीटीआय, गुवाहाटी : आसाममधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून, सुमारे पाच लाख नागरिक बाधित झाले आहेत. पुरामुळे एक जण मृत्युमुखी पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. ब्रह्मपुत्रेसह राज्यातील प्रमुख नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याची माहितीही त्यांनी दिली. पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, त्यामुळे पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या (एएसडीएमए) अहवालानुसार गुरुवारी सायंकाळपर्यंत चार लाख ९५ हजार नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. उदलगुरी जिल्ह्यातील तामुलपूर येथे पुरामुळे एकाचा मृत्यू झाला. केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार ब्रह्मपुत्रा नदी नेमतीघाट (जोऱ्हाट) आणि धुबरी येथे धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. पुथिमारी (कामरूप), पगलागिया (नलबारी) आणि मानस (बारपेटा) या नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. विभागीय हवामान केंद्राने शुक्रवारी ‘येलो अलर्ट’ दिला आहे.

in pune one killed and one injured in rickshaw-dumper collision
पुणे : रिक्षा-डंपरच्या धडकेत एक ठार, एक जखमी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Congo
Congo Mass Murder : ‘काँगो’मध्ये बंडखोरांच्या हल्ल्यानंतर भीषण नरसंहार! तुरूंगातील शेकडो महिलांवर बलात्कार करून जिवंत जाळलं
vasai virar increase population news in marathi
शहरबात : वाढत्या लोकसंख्येचे बळी
SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
The Central Housing Department has asked for additional funds for private developers under the Pradhan Mantri Awas Yojana Mumbai news
पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना जादा निधी? केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून विचारणा
At least 30 killed in stampede at Mahakumbh
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी; किमान ३० जणांचा बळी; ६०भाविक जखमी

राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस आणि गडगडाटासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यातील १६ जिल्हे आणि चार उपविभाग पूरग्रस्त झाले आहेत. बजाली उपविभागास पुराचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. येथील दोन लाख ६० हजार नागरिक बाधित झाले आहेत. सात जिल्ह्यांतील ८३ मदत छावण्यांत १४ हजारांहून अधिक नागरिकांनी आश्रय घेतला आहे. तसेच ७९ मदत वितरण केंद्रे कार्यान्वित आहेत.

Story img Loader