काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ‘भारत जोडो न्याय यात्रा’ गुरूवारी आसाममध्ये पोहोचली. यावेळी राहुल गांधी यांनी आसामच्या भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. देशातील सगळ्यात भ्रष्ट सरकार आणि भ्रष्ट मुख्यमंत्री आसाममध्ये आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. याला मुख्यमंत्री हिंमत बिस्व सरमा यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील हॅलोटिंग येथे राहुल गांधींनी जनतेला संबोधित केलं आहे. यावेळी राहुल गांधींनी सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर द्वेष आणि जनतेचे पैसे लुटल्याचा आरोप केला आहे.

Devendra Fadnavis reply to Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “जब एक ही चुटकुला बार-बार…”, राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीसांचे एका वाक्यात प्रत्युत्तर
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
नामदेव महाराज शास्त्री हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील भगवानगडाचे महंत आहेत. (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Namdev Shastri Kirtan : कोण आहेत भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री? त्यांच्या कीर्तनास विरोध का होत आहे?
PM Narendra Modi In Rajya Sabha
PM Modi In Rajya Sabha : “लता मंगेशकर यांच्या भावाला कायमचे…” पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत काँग्रेसवर हल्लाबोल
What Historian Inderjit Sawant Said?
Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांनी महाराष्ट्राचं मन दुखावलं आहे, माफी मागितली पाहिजे; इतिहासकार इंद्रजीत सावंत यांची मागणी
Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?

“देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आणि भ्रष्ट मुख्यमंत्री आसाममध्ये आहे. इथे काय चालले आहे, हे जनतेला माहिती आहे. न्याय यात्रेदरम्यान आम्ही आसामचे प्रश्न प्राधान्याने मांडू,” असं राहुल गांधींनी म्हटलं.

“मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचे कुटुंब भ्रष्टाचारात गुंतलं आहे. मुख्यमंत्र्यांना वाटते पैशानं जनतेला विकत घेता येतं. पण, आसामी जनतेला विकत घेता येणार नाही. आदिवासी आणि चहा कामगारांवर भाजपा सरकारकडून खूप अन्यायकेला जातोय,” असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

राहुल गांधींनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री हिंमत बिस्व सरमा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “गांधी कुटुंब हे देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. ते भ्रष्टच नाही, तर डुप्लिकेट आहेत. त्यांच्या कुटुंबाचे नाव गांधी नाही,” असं टीकास्र हिंमत बिस्व सरमा यांनी डागलं आहे.

Story img Loader