पीटीआय, नवी दिल्ली

राजधानी दिल्लीतील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जलमंत्री अतिशी यांनी बुधवारी पाणीटंचाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवत तसेच येत्या दोन दिवसांत यावर तोडगा न काढल्यास २१ जूनपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेत अतिशी यांनी मोदींना पत्र पाठवल्याची माहिती दिली. तसेच हरियाणा दिल्लीच्या वाट्याचे पाणी सोडत नसल्याने दिल्लीला जलसंकटाला तोंड द्यावे लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

BJP questioned Rahul Gandhi after a corruption case was filed against Siddaramaiah
सिद्धरामय्यांच्या पाठीशी राहणार का?भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपचा राहुल गांधी यांना सवाल
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Jagan Mohan Reddy
नायडूंना खोटे बोलण्याची सवयच, जगन मोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र; मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप
bjp minister ravindra chavan target over potholes issues by publish banner on birthday
डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाची टिंगल करणारे फलक लावणाऱ्यांविरुध्द गुन्हा
district water conservation officer issue notice to three contractors over poor canal work
चंद्रपूर : लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील कंत्राटदारांना नोटीस; कारण काय?
BJP MLA Munirathna Naidu
BJP MLA Munirathna Naidu : कंत्राटदाराचा छळ केल्याप्रकरणी भाजपाच्या आमदाराला अटक; कोण आहेत मुनीरत्न नायडू?
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : सिंह यांचा राजीनामा घेणेच हिताचे

हरियाणाने मंगळवारी दिल्लीला ६१३ ऐवजी ५१३ दशलक्ष गॅलन पाणी सोडले. एक दशलक्ष गॅलन पाणी २८,५०० नागरिकांना पुरते. म्हणजेच २८ लाखांहून अधिक नागरिकांसाठी पाणी सोडलेच नाही, असा दावा अतिशी यांनी केला. आधीच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त असताना, त्यात पाणीटंचाईचीही भर पडल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जलसंकटावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. येत्या दोन दिवसांत यावर तोडगा काढला नाही तर २१ जूनपासून मी बेमुदत संपावर जाईन, असा इशाराही अतिशी यांनी दिला. पाणीटंचाईच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी हरियाणा सरकारला अनेक पत्रे लिहिल्याचेही अतिशी यांनी या वेळी नमूद केले.