भारतातील निवडणूक कव्हर करण्याची परवानगी नाकारून ऑस्ट्रेलिअन पत्रकार अवनी डायसला भारत सोडण्यास भाग पाडले असल्याचा आरोप अवनीने केला आहे. मात्र हा दावा चुकीचा, दिशाभूल करणारा आणि खोडकर आहे, असे अधिकृत सूत्रांनी मंगळवारी सांगितले. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या दक्षिण आशिया प्रतिनिधी असलेल्या अवनी डायसने २० एप्रिल रोजी भारत सोडला. डायसने आरोप केला होता की तिला सरकारकडून नियमित व्हिसाची मुदतवाढ नाकारली जाईल असे सांगण्यात आले होते. तिला परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने फोनवर या निर्णयाची माहिती दिली होती.तर, तिने व्हिसा नियमांचं उल्लंघन केल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितल. परंतु, तिच्या विनंतीनुसार तिला आश्वासन देण्यात आले की सार्वत्रिक निवडणुकांच्या कव्हरेजसाठी तिचा व्हिसा वाढविला जाण्याची शक्यता आहे.

Draupadi Murmu and sonia gandhi
Sonia Gandhi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या भाषणावर सोनिया गांधींची टीका, म्हणाल्या, “भाषण करताना…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What are Blue Corner and Red Corner Notices issued by Interpol
इंटरपोलकडून जारी होणाऱ्या ब्लू कॉर्नर, रेड कॅार्नर नोटिस म्हणजे काय? किती महत्त्व आहे अशा नोटिसांना?
Neelam Gorhe, 8 class Pass Method ,
आठवीपर्यंत नापास न करणारे सरकार जनतेकडून नापास; डॉ. नीलम गोऱ्हे यांची टीका
Colonial hegemony through technological superiority
तंत्रकारण: तांत्रिक श्रेष्ठतेतून वसाहती वर्चस्ववाद
One Nation One Election
One Nation One Election : ‘एक देश, एक निवडणूक’ अहवालाच्या मसूद्यासाठी किती पैसे खर्च झाले? सरकारने सांगितलेल्या आकड्यावर विश्वास बसणार नाही
shivsena leader sanjay raut
पदाधिकारी म्हणतात आपण स्वबळावर लढलं पाहिजे – संजय राऊत
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांवरच बलात्काराचा गुन्हा, पक्षासमोरील अडचणी वाढल्या; हरियाणात राजकीय घडामोडींना वेग (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांवरच बलात्काराचा गुन्हा, पक्षासमोरील अडचणी वाढल्या; हरियाणात राजकीय घडामोडींना वेग

डायसचा पूर्वीचा व्हिसा २० एप्रिलपर्यंत वैध होता आणि तिने १८ एप्रिलला व्हिसाची फी भरली होती. त्याच दिवशी तिचा व्हिसा जून अखेरपर्यंत वाढवण्यात आला होता, असे सूत्रांनी सांगितले. परंतु, डायसने २० एप्रिल रोजी भारत सोडण्याचा निर्णय घेतला. भारत सोडण्यापूर्वी तिच्या वैध व्हिसा होता, तसंच तिच्या व्हिसाची मर्यादा मंजूरही झाली होती. निवडणुका कव्हर करण्यास परवानगी नसल्याबद्दलचा तिचा मुद्दा देखील वस्तुस्थितीनुसार चुकीचा आहे, असं सरकारी सूत्रांचं म्हणणं आहे.

व्हिसाधारक पत्रकारांना भारतातील निवडणूक कव्हर करण्याची परवानगी आहे. फक्त हे पत्रकार मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्रावर वैध अधिकार पत्रे घेतल्याशिवाय प्रवेश करू शकत नाहीत. तथापि, व्हिसाच्या मुदतवाढीची प्रक्रिया सुरू असताना त्यावर प्रक्रिया केली जाऊ शकत नाही.

Story img Loader