Ram Temple Inauguration : अयोध्येचे राजे बिमलेंद्र मिश्रा यांनी म्हटलं आहे की प्रशासनाला शहरात पंचतारांकित हॉटेल्स उभारण्याची १०० निवेदनं आली आहेत. एक काळ असा होता की या भागात काहीही व्यवस्था नव्हती. काही वर्षांपूर्वी हॉटेल्सही नव्हते. राम मंदिर निर्मितीनंतर आणि २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यानंतर पर्यटन व्यवसायाला उभारी मिळणार आहे. २२ जानेवारीनंतर हे मंदिर सगळ्या लोकांसाठी खुलं होणार आहे. सीतामातेने शाप मागे घेतल्याने ही प्रगती झाल्याचं दिसतं आहे असंही मिश्रा यांनी म्हटलं आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा हे अयोध्येच्या शाही कुटुंबाचे सदस्य आहेत. या कुटुंबाचा इतिहास राजा दर्शन सिंह यांच्यापासूनचा आहे. अयोध्येत बिमलेंद्र मिश्रा यांना राजे म्हटलं जातं आहे. १९ व्या शतकात दर्शन सिंह यांचं राज्य होतं. तर बिमलेंद्र मिश्रा हे आंदोलनात सहभागी झाले होते.

Bhosari MIDC Garbage piles
भोसरी एमआयडीसीत कचऱ्याचे साम्राज्य
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
cpm polit bureau
सीताराम येचुरींच्या निधनानंतर महासचिवपदी कोणाची निवड होणार? ‘ही’ नावे आहेत चर्चेत!
Sarsanghchalak Mohan Bhagwat appeal to the bjp new generation regarding Pt DeenDayal Upadhyay
भाजपच्या आजच्या पिढीने दीनदयाळजींचे गुण अंगीकारावेत; सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन
tirupati temple animal fat in laddoos row
चंद्राबाबू नायडूंच्या आरोपानंतरही तिरुपती मंदिरातील लाडूच्या विक्रीवर परिणाम नाही; गेल्या चार दिवसांत विकले गेले तब्बल ‘इतके’ लाडू
High Court asks Censor Board over the exhibition certificate of the film Emergency Mumbai print news
देशातील नागरिक मूर्ख वाटतात का ? ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शन प्रमाणपत्रावरून उच्च न्यायालयाची सेन्सॉर मंडळाला विचारणा
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
pune Kalyani group marathi news
मुखत्यारनाम्यासंबंधी आरोप निराधार; कल्याणी समूहाचे स्पष्टीकरण, कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचेही प्रतिपादन

काय म्हणाले बिमलेंद्र मिश्रा?

“सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अयोध्येत आनंदाचं वातावरण निर्माण झालं. अयोध्येत व्यवस्थित हॉटेल्स नव्हती. आता या ठिकाणी फाईव्ह स्टार हॉटेल्स सुरु करण्यासाठी १०० निविदा आल्या आहेत. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी मला ही बाब सांगितली आहे.” असं बिमलेंद्र मिश्रा यांनी म्हटलं आहे.

अयोध्येचे राजे बिमलेंद्र मिश्रा म्हणाले की आता शहर स्मार्ट सिटी होतं आहे. मला वाटतं आहे की पुढची पाच वर्षे लोक फक्त दर्शनासाठी नाही तर अयोध्या पाहण्यासाठी येतील. अयोध्येला पवित्र नगरीचं स्वरुप आलं आहे. सीतामातेने जो शाप दिला होता तो तिने मागे घेतला आहे. त्यामुळेच आता अयोध्येची प्रगती होते आहे असंही त्यांनी म्हटलं.

स्थानिकांच्या मान्यतेनुसार, जेव्हा प्रभू रामचंद्रांनी जेव्हा सीतेचा त्याग केला तेव्हा सीतामातेने अयोध्येला शाप दिला. लोक हे देखील मानतात की या शापामुळेच अयोध्येचा विकास झाला नाही. आता बिमलेंद्र मिश्रा यांनी सीतामातेने शाप मागे घेतला आहे म्हणून इथे विकास होऊ लागल्याचं म्हटलं आहे.