Bangladesh Crisis UN Report : बांगलादेशमधील हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. हा हिंसाचार पाहून, जनतेचा उद्रेक पाहून शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन केलं आहे. गेल्या २० ते २५ दिवसांत देशभर झालेल्या हिंसाचारात ६५० लोकांचा बळी गेला आहे. तसेच शेकडो लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अल्पसंख्याकांची संख्या मोठी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात बांगलादेशमधील अराजकतेबाबतची माहिती व आकडेवारी सादर करण्यात आली आहे. यूएनएचसीआरच्या (संयुक्त राष्ट्रांचे निर्वासितांसाठीचे उच्चायुक्त) अहवालानुसार १६ जुलै ते ४ ऑगस्टदरम्यान बांगलादेशातील हिंसाचारात ४०० लोकांचा बळी गेला आहे. तर, ५ व ६ ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचारात २५० हून अधिक लोक मारले गेले आहेत. शेकडो लोक जखमी झाले आहेत. तर, शेकडो कुटुंबं बेघर झाली आहेत. याच हिंसाचारामुळे शेख हसीना यांनी बांगलादेशमधून पलायन केलं आहे.

१६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान विद्यार्थी व तरुणांच्या आंदोलनानंतर उफाळलेल्या हिंसेत ६५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये अल्पसंख्याक हिंदू सर्वाधिक आहेत. तसेच यात इतर अल्पंख्याक, पत्रकार, पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. देशभरातील सर्वच रुग्णालये रुग्णांनी भरली आहेत. नव्या रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक नाही. मृतांची संख्या ६५० हून अधिक असू शकते. मात्र अधिकाऱ्यांनी रुग्णालयांना माहिती देण्यापसून रोखलं आहे. त्यामुळे मृतांची नेमकी संख्या समजू शकली नसल्याचं यूएनएचसीआरच्या (United Nations High Commissioner for Refugees) अहवालात म्हटलं आहे.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
bangladesh violence
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसक संघर्ष; सत्तांतरानंतरही बांगलादेशी निषेध का करत आहेत?
Supreme Court Contempt Notice To Maharashtra additional Chief Secretary
Supreme Court : “हे कसले IAS अधिकारी?” सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना सुनावलं, नोटीसह बजावली
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
Pakistan International Airlines Flight
पाकिस्तानच्या विमानाने तुम्ही कधी प्रवास केलाय का? प्रवाशाने शेअर केलेला Video पाहून तुमचीही झोप उडणार!

हे ही वाचा >>  ७२ तासात सहा हजार हिंदूंचे शिरकाण; १६ ऑगस्ट हा दिवस भारत-पाकिस्तान फाळणीला कसा ठरला कारणीभूत?

यूएनएचआरसीच्या अहवालात म्हटलंय की संरक्षण दलांनी बळाचा अधिक वापर केला आहे. ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर देशभर लूट, दरोडे व अल्पसंख्याकांवरील हल्ल्याच्या बातम्या येऊ लागल्या. दोन दिवसांनी काठ्या, लोखंडी रॉड, पाईप व दगड घेऊन आलेल्या मोठ्या जमावाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीग पार्टीची कार्यालये, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर हल्ले केले.

हे ही वाचा >> केंद्र सरकारकडून समितीची घोषणा, आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना; डॉक्टरांचा देशव्यापी संप

यूएनचं पथकं बांगलादेशला जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार

यूएनएचआरसीचे प्रमुख वोल्कर तुर्क यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “हिंसाचार करणारे, या हिंसाचारास कारणीभूत असलेले व ज्यांच्या बेजबाबदारपणामुळे शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी. या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास व्हायला हवा.” तुर्क यांनी सांगितलं की यूएनएचसीआरचं एक पथक बांगलादेशला जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. हे पथक तिथे राहून हिंसाचाराच्या घटनांचा तपास करेल.