पुढे जाऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद मिळवायचे असल्यानेच सध्या मंडळातील कोणीही एन. श्रीनिवासन यांचा राजीनामा मागत नसल्याचे मत माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी मंगळवारी व्यक्त केले.
आता कोणालाच एन. श्रीनिवासन यांना विरोध करायचा नाहीये. काही जणांना पुढे बीसीसीआयचे अध्यक्षपद मिळवायचे आहे. आता जर श्रीनिवासन यांना विरोध केला, तर त्यांच्याकडील १० ते १५ मते आपल्याला मिळणार नाही. म्हणूनच मंडळातील कोणीही श्रीनिवासन यांचा राजीनामा मागत नाहीये, असे कीर्ती आझाद यांनी म्हटले आहे.
क्रिकेट मंडळातील सगळ्यांची अवस्था गांधींजींनी सांगितलेल्या तीन माकडांप्रमाणे झालेली आहे. ते सगळेच एकमेकांना सहकार्य करताहेत, अशीही टीका त्यांनी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा