दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० असा निर्भळ विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) टीम इंडियाला दोन कोटींचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयने मंगळवारी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. भारताने सोमवारी दिल्ली कसोटीत आफ्रिकेवर ३३७ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. आफ्रिकेच्या फलंदाजांनी हा कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यासाठी निकराचा संघर्ष केला. मात्र, भारतीय फिरकीपटूंनी त्यांना चकवा देत आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या १४३ धावांत गुंडाळला होता. या विजयासह भारताने कसोटी क्रिकेट क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा